शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus जीडीपी ४.८ टक्क्यांवर घसरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 05:28 IST

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसंयुक्त राष्ट्रे : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती कमी होणार असून, भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता संयुक्त राष्टÑांनी जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल सर्व्हे ्रआॅफ एशिया अ‍ॅण्ड पॅसिफिक (एस्केप)२०२०’ असे या सर्वेक्षणाचे नाव आहे. त्यामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांवर कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन कमी होऊन ४.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. याआधी हे उत्पादन ५ टक्के राहण्याचा अंदाज होता. सध्या उपलब्ध असलेल्या अतिशय प्रारंभिक माहितीवर हे निष्कर्ष काढण्यात आले असून, यापुढील काळामध्ये त्यात बदल होण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्यापही ओसरलेला नसून त्याचा अर्थव्यवस्थेवर अजून किती परिणाम होईल, ते आताच सांगता येणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कमी झालेले औद्योगिक उत्पादन, देशामध्ये कमी प्रमाणात येत असलेली गुंतवणूक त्याचबरोबर वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण याचा परिणामही अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर अधिक प्रमाणात कमी होण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे.या संकटामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक या क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय विविध देशांमध्ये असलेले नजीकचे सहकार्य आणि त्यांचे एकमेकांवर असलेले आर्थिक अवलंबित्व यामुळे आर्थिक संकट आणखी वाढण्याची भीतीही यामध्ये व्यक्त झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आशिया प्रशांत क्षेत्राला बसणारा फटका हा ०.६ ते ०.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही रक्कम १३२ ते १७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. ही रक्कम केवळ व्यापारामध्ये झालेल्या कपातीमुळे असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८मध्ये या विभागाचा विकास दर ५.३ टक्के होता, तो २०१९ मध्ये ४.३ टक्क्यांवर आला आहे.औषध उद्योगही येणार अडचणीतभारतामधील औषधनिर्मिती उद्योगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल हा मोठ्या प्रमाणात चीनमधून येत असतो. चीनमधील मोठ्या लॉकडाउनमुळे तेथील उत्पादन ठप्प झाल्याने भारतातील औषधनिर्मिती उद्योगाला कच्च्यामालाची टंचाई जाणवण्याची शक्यताही या अहवालामध्ये वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था