शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus जीडीपी ४.८ टक्क्यांवर घसरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 05:28 IST

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसंयुक्त राष्ट्रे : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती कमी होणार असून, भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता संयुक्त राष्टÑांनी जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल सर्व्हे ्रआॅफ एशिया अ‍ॅण्ड पॅसिफिक (एस्केप)२०२०’ असे या सर्वेक्षणाचे नाव आहे. त्यामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांवर कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन कमी होऊन ४.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. याआधी हे उत्पादन ५ टक्के राहण्याचा अंदाज होता. सध्या उपलब्ध असलेल्या अतिशय प्रारंभिक माहितीवर हे निष्कर्ष काढण्यात आले असून, यापुढील काळामध्ये त्यात बदल होण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्यापही ओसरलेला नसून त्याचा अर्थव्यवस्थेवर अजून किती परिणाम होईल, ते आताच सांगता येणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कमी झालेले औद्योगिक उत्पादन, देशामध्ये कमी प्रमाणात येत असलेली गुंतवणूक त्याचबरोबर वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण याचा परिणामही अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर अधिक प्रमाणात कमी होण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे.या संकटामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक या क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय विविध देशांमध्ये असलेले नजीकचे सहकार्य आणि त्यांचे एकमेकांवर असलेले आर्थिक अवलंबित्व यामुळे आर्थिक संकट आणखी वाढण्याची भीतीही यामध्ये व्यक्त झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आशिया प्रशांत क्षेत्राला बसणारा फटका हा ०.६ ते ०.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही रक्कम १३२ ते १७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. ही रक्कम केवळ व्यापारामध्ये झालेल्या कपातीमुळे असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८मध्ये या विभागाचा विकास दर ५.३ टक्के होता, तो २०१९ मध्ये ४.३ टक्क्यांवर आला आहे.औषध उद्योगही येणार अडचणीतभारतामधील औषधनिर्मिती उद्योगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल हा मोठ्या प्रमाणात चीनमधून येत असतो. चीनमधील मोठ्या लॉकडाउनमुळे तेथील उत्पादन ठप्प झाल्याने भारतातील औषधनिर्मिती उद्योगाला कच्च्यामालाची टंचाई जाणवण्याची शक्यताही या अहवालामध्ये वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था