शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 21:21 IST

३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या ३ वर्षापासून जगभरात कोविड महामारीचं संकट उभं राहिले आहे. या महामारीच्या जाळ्यात अनेक जण अडकले. कोविड-१९ मुळे गेल्या आठ आठवड्यात १.७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हे असे आकडे आहेत ज्यांचे अहवाल समोर आले आहेत. खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असेल हे आम्हाला माहीत आहे असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केले आहे. त्याचसोबत कोरोना महामारी कधी संपणार नाही असा इशाराही WHO नं दिला आहे. 

WHO च्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन इमर्जन्सी कमिटीने म्हटलं आहे की, जगातून कोरोना व्हायरस मनुष्य आणि प्राण्यांपासून दूर करणे जवळजवळ अशक्य आहे. केवळ आपण त्याचे भयंकर परिणाम कमी करू शकतो. लोकांचे मृत्यू कमी करू शकतात. लोकांना त्याचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकतो. परंतु ही महामारी जागतिक आरोग्य आणीबाणी कायम राहील.

जगभरातील आरोग्य यंत्रणा कोविड-१९ शी झुंज देत आहेत. त्यामुळे इतर मोठ्या आजारांकडेही लक्ष देणे कठीण होत आहे. कारण कोविडला अजूनही प्रामुख्याने घेतले जात आहे. कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगाची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे असंही कमिटीनं म्हटलं. 

दरम्यान, कोरोना व्हायरसला(Corona Virus) कमी लेखणे ही एक मोठी चूक असू शकते. तो आपल्याला कायम सरप्राइज करेल. तो आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत राहील. म्हणूनच आपल्याला अधिक वैद्यकीय साधने आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची गरज आहे. हा विषाणू आपल्या माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये स्थिरावला आहे. आता अनेक पिढ्या संपणार नाहीत. म्हणूनच सर्वात मोठी गरज आहे ती योग्य लस आणि अधिक लसीकरणाची. जेणेकरून लोकांना रोगप्रतिकारक शक्ती दिली जाऊ शकते असं टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले. 

भारतात काय परिस्थिती?३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे जवळपास ९९ टक्के लोकही कोरोनामधून बरे झाले आहेत. भारतात तीन वर्षांत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पहिली लाट घाबरवलं, दुसर्‍याने लाटेनं रडवलं आणि तिसर्‍याने बऱ्यापैकी सांभाळलं 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या