शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

coronavirus: काही दिवसांपूर्वी मृत्यूने थैमान घातलेल्या या देशाने मिळवले कोरोनावर नियंत्रण, आठवडाभरात झाला नाही एकही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:15 IST

जिथे काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते अशा देशांमध्ये कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

माद्रिद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग सध्या संकटात सापडलेले आहे. भारतासह इतर काही देशांत कोरोनामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र दुसरीकडे जिथे काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते अशा देशांमध्ये कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये स्पेनचाही समावेश होता. मात्र स्पेनने आता कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून,  तिथे गेल्या आठवडाभरापासून एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही. 

स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने हल्लीच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यंची नोंद करण्याची पद्धत बदलली आहे. त्यानंतर ७ जूनपासून या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. मात्र तज्ज्ञांकडून स्पेन सरकारच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. स्पेनमध्ये ७ जूनपर्यंत २७ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत तिथे २ लाख ९१ हजार ००८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

भारत आणि स्पेनमध्ये एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. नंतर स्पेनमध्ये कोरोनाने गंभीर रूप घेतले होते. त्यामुळे तिथे दररोज शेकडो जणांचे मृत्यू होत होते. दरम्यान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सरकारच्या नव्या धोरणामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा नियंत्रणात आल्याचे स्पेनमधील आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रादेशिक आकडे मिळत नसल्याने कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा अपडेट करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय