शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 01:40 IST

इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल.

नवी दिल्ली : इराणमधील २०० भारतीय नागरिकांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विमानतळावर हे विमान पोहोचण्याची शक्यता आहे. १५ मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येईल. इराणहून तिसºया टप्प्यात १६ वा १७ मार्च रोजी विमान दाखल होईल.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत गुरुवारी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग हा चिंतेचा विषय आहे. इराण, इटलीसह जगभरातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. भारताने विदेशींच्या प्रवेशावर पूर्ण प्रतिबंध आणला नसल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये ६००० भारतीय फसले आहेत. यातील ११०० महाराष्ट्रातील प्रवासी आहेत आणि ते इराणच्या कोममध्ये अडकले आहेत, तर जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या ५२९ नमुन्यांपैकी २२९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जयशंकर यांनी सांगितले की, इराणमध्ये १००० भारतीय मच्छीमार अडकले आहेत. यातील कोणत्याही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल. जगातील ९० देशांत कोरोना पसरला आहे. काही प्रकरणांत सरकारने ई-व्हिसा आणि व्हिसा आॅन अरायव्हल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास करणाºया भारतीय नागरिकांना १५ दिवसांपर्यंत वेगळे ठेवण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीला स्वदेशात परतण्यासाठी संक्रमणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असणार आहे. ते म्हणाले की, जे विद्यार्थी इराणमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी श्रीनगरमध्ये भेटलो आहे. आपण त्यांना आश्वासन दिले आहे की, त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी सुविधा देईल.

टॅग्स :corona virusकोरोना