शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

Corona Virus: चीननंतर इटलीत कोरोनाची दहशत; एका दिवसात तब्बल ३६८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 11:41 IST

Corona Virus: इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

ठळक मुद्देरविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहेमहायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले होतेकोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. चीनपाठोपाठइटलीमध्येकोरोना व्हायरसमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. आशियातील चीन हा कोरोनाचा केंद्रबिंदू होता तर युरोपातील इटलीवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे.

इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. एका दिवसात इटली कोरोनामुळे इतके लोक मृत्यू झाले जेवढे दुसऱ्या महायुद्धातही एका दिवसात झाले नाहीत. रविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा आकडा सगळ्यात मोठा आहे. याच्या एक दिवसाअगोदरच इटलीत २५० जणांचा जीव गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आकडा इटलीत किती भयंकर आहे याची कल्पना देते. 

जर दुसऱ्या महायुद्धात एका दिवसात झालेल्या मृत्यूची तुलना केल्यास कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. महायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले. तर कोरोनामुळे एका दिवसात २५० आणि ३६८ हा आकडा गाठला. ६ वर्ष सुरु असलेल्या महायुद्धाची तुलना कोरोना व्हायरसची होऊ शकत नाही. मात्र सरासरी मृत्यूंचा आकडा पाहायला गेला तर कोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे. 

कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. यातील ६५०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनमध्ये ३२०० तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ११२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराचा धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे असं रोहित दत्ता यांनी सांगितले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोनाItalyइटलीchinaचीनIndiaभारत