शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

Corona Virus: चीननंतर इटलीत कोरोनाची दहशत; एका दिवसात तब्बल ३६८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 11:41 IST

Corona Virus: इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

ठळक मुद्देरविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहेमहायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले होतेकोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. चीनपाठोपाठइटलीमध्येकोरोना व्हायरसमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. आशियातील चीन हा कोरोनाचा केंद्रबिंदू होता तर युरोपातील इटलीवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे.

इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. एका दिवसात इटली कोरोनामुळे इतके लोक मृत्यू झाले जेवढे दुसऱ्या महायुद्धातही एका दिवसात झाले नाहीत. रविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा आकडा सगळ्यात मोठा आहे. याच्या एक दिवसाअगोदरच इटलीत २५० जणांचा जीव गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आकडा इटलीत किती भयंकर आहे याची कल्पना देते. 

जर दुसऱ्या महायुद्धात एका दिवसात झालेल्या मृत्यूची तुलना केल्यास कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. महायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले. तर कोरोनामुळे एका दिवसात २५० आणि ३६८ हा आकडा गाठला. ६ वर्ष सुरु असलेल्या महायुद्धाची तुलना कोरोना व्हायरसची होऊ शकत नाही. मात्र सरासरी मृत्यूंचा आकडा पाहायला गेला तर कोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे. 

कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. यातील ६५०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनमध्ये ३२०० तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ११२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराचा धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे असं रोहित दत्ता यांनी सांगितले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोनाItalyइटलीchinaचीनIndiaभारत