शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

दुबईत झाली COP 28 परिषद, ठरल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; पण अजरबैजानबाबत आधीच वाद का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 17:33 IST

पंतप्रधान मोदी देखील या परिषदेत झाले होते सहभागी

COP म्हणजेच विविध पक्षांची परिषद (Conference of the parties) ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद आहे. ही परिषद संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेली आहे. COP 28 ही परिषदेची २८वी आवृत्ती आहे. २८ नोव्हेंबरला सुरू झालेली पक्षांची परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार होती, पण बुधवारी १३ डिसेंबरला संपली. सुमारे दोन आठवडे चाललेली ही परिषद दुबईतील एक्स्पो सिटी येथे पार पडली. UAE हे या परिषदेचे यजमान होते, पण त्याच गोष्टीला प्रचंड विरोध झाला. यामागचे नक्की कारण काय, जाणून घेऊया.

दुबईमध्ये सुमारे 140 देशांचे राष्ट्रप्रमुख, 70 हजारांहून अधिक सदस्य आणि हवामान विषयावरील तज्ज्ञ एकत्र आले होते. भारताच्या वतीने COP 28 मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी दुबईला पोहोचले आणि या शिखर परिषदेत सहभागी झाले. शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी अशी घोषणा झाली ज्याची जगाला पहिल्या दिवसापासून अपेक्षा होती. परिषदेच्या शेवटच्या दिवशी कोळसा, तेल आणि वायूचा वापर बंद करण्याबाबत एकमत झाले. काही टीकांव्यतिरिक्त, याला ऐतिहासिक करार म्हटले गेले.

सामंजस्य करारातील ३ महत्त्वाच्या बाबी:

  • पहिली बाब- तीन दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाने हवामान करारांमध्ये जीवाश्म इंधनाचा थेट उल्लेख टाळला. याचे कारण जगातील तेल आणि वायूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे देश होते. या मुद्यावर काही देश प्रत्येक वेळी अडथळे आणत असत पण यावेळी ही स्थिती वेगळी दिसली. हळूहळू जीवाश्म इंधने टप्याटप्याने काढून टाकली जातील असे ठरले.
  • दुसरी बाब- 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 43 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2035 पर्यंत त्यात 60 टक्के कपात करण्याचे मान्य करण्यात आले आहे. एकीकडे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा करार झाला आहे, तर दुसरीकडे अक्षय्य ऊर्जा तिप्पट करण्याचा करार झाला.
  • तिसरी बाब- ज्या देशांना हवामान बदलाचा फटका बसला आहे आणि विकसित होत आहेत, आणि या आपत्तीशी लढण्यासाठी इतका पैसा नाही अशा देशांसाठीही तोटा आणि नुकसान निधी तयार करण्यात आला आहे. अनेक देशांनी यामध्ये सहभागाबद्दल बोलले आहे. अंदाजे 700 दशलक्ष डॉलर्सचे सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.

अझरबैजान वरून वाद का?

COP 29 पुढील वर्षी अझरबैजानमध्ये होणार असून ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद असणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अझरबैजानला हे आयोजन करण्यापूर्वीच जगभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी अझरबैजानवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशात हवामान बदलाच्या उपायांबद्दल बोलणे आणि अजरबैजानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचाही आरोप या दोन गोष्टी इतर सदस्यांना खटकणाऱ्या आहेत. त्यामुळे यावरून वाद सुरू झाला आहे.

COP म्हणजे काय, कधी सुरू झाले, उद्देश काय?

COP ची स्थापना 1992 साली झाली. हा हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनचा किंवा UNFCCC चा एक भाग आहे. ते हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करते आणि निर्णय घेते. संयुक्त राष्ट्रांच्या या आराखड्यावर जगातील सुमारे १९७ देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्या प्रतिनिधींना पक्ष म्हणतात. सर्व प्रतिनिधी एका परिषदेसाठी एकत्र येत असल्याने त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात. ही त्याची 28 वी आवृत्ती होती, म्हणून त्याला कॉप 28 म्हटले गेले.

टॅग्स :Dubaiदुबईweatherहवामान