शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दुबईत झाली COP 28 परिषद, ठरल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; पण अजरबैजानबाबत आधीच वाद का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 17:33 IST

पंतप्रधान मोदी देखील या परिषदेत झाले होते सहभागी

COP म्हणजेच विविध पक्षांची परिषद (Conference of the parties) ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद आहे. ही परिषद संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेली आहे. COP 28 ही परिषदेची २८वी आवृत्ती आहे. २८ नोव्हेंबरला सुरू झालेली पक्षांची परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार होती, पण बुधवारी १३ डिसेंबरला संपली. सुमारे दोन आठवडे चाललेली ही परिषद दुबईतील एक्स्पो सिटी येथे पार पडली. UAE हे या परिषदेचे यजमान होते, पण त्याच गोष्टीला प्रचंड विरोध झाला. यामागचे नक्की कारण काय, जाणून घेऊया.

दुबईमध्ये सुमारे 140 देशांचे राष्ट्रप्रमुख, 70 हजारांहून अधिक सदस्य आणि हवामान विषयावरील तज्ज्ञ एकत्र आले होते. भारताच्या वतीने COP 28 मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी दुबईला पोहोचले आणि या शिखर परिषदेत सहभागी झाले. शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी अशी घोषणा झाली ज्याची जगाला पहिल्या दिवसापासून अपेक्षा होती. परिषदेच्या शेवटच्या दिवशी कोळसा, तेल आणि वायूचा वापर बंद करण्याबाबत एकमत झाले. काही टीकांव्यतिरिक्त, याला ऐतिहासिक करार म्हटले गेले.

सामंजस्य करारातील ३ महत्त्वाच्या बाबी:

  • पहिली बाब- तीन दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाने हवामान करारांमध्ये जीवाश्म इंधनाचा थेट उल्लेख टाळला. याचे कारण जगातील तेल आणि वायूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे देश होते. या मुद्यावर काही देश प्रत्येक वेळी अडथळे आणत असत पण यावेळी ही स्थिती वेगळी दिसली. हळूहळू जीवाश्म इंधने टप्याटप्याने काढून टाकली जातील असे ठरले.
  • दुसरी बाब- 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 43 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2035 पर्यंत त्यात 60 टक्के कपात करण्याचे मान्य करण्यात आले आहे. एकीकडे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा करार झाला आहे, तर दुसरीकडे अक्षय्य ऊर्जा तिप्पट करण्याचा करार झाला.
  • तिसरी बाब- ज्या देशांना हवामान बदलाचा फटका बसला आहे आणि विकसित होत आहेत, आणि या आपत्तीशी लढण्यासाठी इतका पैसा नाही अशा देशांसाठीही तोटा आणि नुकसान निधी तयार करण्यात आला आहे. अनेक देशांनी यामध्ये सहभागाबद्दल बोलले आहे. अंदाजे 700 दशलक्ष डॉलर्सचे सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.

अझरबैजान वरून वाद का?

COP 29 पुढील वर्षी अझरबैजानमध्ये होणार असून ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद असणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अझरबैजानला हे आयोजन करण्यापूर्वीच जगभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी अझरबैजानवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशात हवामान बदलाच्या उपायांबद्दल बोलणे आणि अजरबैजानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचाही आरोप या दोन गोष्टी इतर सदस्यांना खटकणाऱ्या आहेत. त्यामुळे यावरून वाद सुरू झाला आहे.

COP म्हणजे काय, कधी सुरू झाले, उद्देश काय?

COP ची स्थापना 1992 साली झाली. हा हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनचा किंवा UNFCCC चा एक भाग आहे. ते हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करते आणि निर्णय घेते. संयुक्त राष्ट्रांच्या या आराखड्यावर जगातील सुमारे १९७ देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्या प्रतिनिधींना पक्ष म्हणतात. सर्व प्रतिनिधी एका परिषदेसाठी एकत्र येत असल्याने त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात. ही त्याची 28 वी आवृत्ती होती, म्हणून त्याला कॉप 28 म्हटले गेले.

टॅग्स :Dubaiदुबईweatherहवामान