शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:09 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान केले आहे.

Shahid Afridi on Pahalgam Attack: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची दहशवाद्यांनी हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर जगभरातून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या श्रद्धांजली वाहिली जात आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना नेहमीच पाठीशी घालणाऱ्या शेजारील पाकिस्तानकडून भारतावरच आरोप केले जात आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित करण्यासारखी कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधारी नेते भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू खेळाडू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. शाहिद आफ्रिदीने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरल्यामुळे लोक संतापले आहेत. शाहिद आफ्रिदीने भारताकडून पुरावे मागितले आहेत. भारताने आधी हे सिद्ध करावे की या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असं आफ्रिदीने म्हटलं. त्यामुळे आफ्रिदीच्या विधानाने भारताच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले. "पाकिस्तानचा राजदूत म्हणून मी म्हणेन की स्पोर्टस डिप्लोमसीवर माझी भूमिका खूप स्पष्ट आहे. यावर कोणतेही राजकारण होऊ नये. आपण शेजारी देश आहोत, आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. पण गोष्ट अशी आहे की हा प्रसंग नुकताच घडला आहे आणि तुम्ही थेट पाकिस्तानचे नाव घेतले. निदान तुम्ही पुरावे घेऊन यावं आणि जगाला सांगावे. कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही. तिथे जे घडले ते दुःखद आहे. पाकिस्तानमध्ये जे घडत आहे ते देखील खेदजनक आहे. अशा गोष्टी घडू नयेत. मला वाटतं की आपले एकमेकांशी चांगले संबंध असले पाहिजेत. लढाईचा कोणताही उपयोग होणार नाही," असे शाहिद आफ्रिदी म्हणाला.

"त्या दहशतवाद्यांनी एक तास तिथे दहशतवाद माजवली होती पण तुमच्या ८ लाख सैनिकांपैकी कोणीही तिथे गेले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी १० मिनिटांत पाकिस्तानला दोष दिला. ते स्वतःच चुका करतात, ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच व्हिडीओ दाखवतात आणि म्हणतात की ते जिवंत आहेत. असं करु नका. पाकिस्तान हा आमचा धर्म आहे, इस्लाम शांततेबद्दल बोलतो. आम्ही भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला तिथून नेहमीच धमक्या येत असतात. आम्हाला माहितही नव्हते की आम्ही तिथे खेळायला जाऊ की नाही. २०१६ च्या विश्वचषकात मी कर्णधार होतो, आम्ही लाहोरमध्ये होतो आणि आम्हाला माहित नव्हते की आमचे भारतात विमान असेल की नाही. म्हणूनच मी म्हणतो की स्पोर्टस डिप्लोमसी ही सर्वोत्तम आहे. तुमचा कबड्डी संघ येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला करायचे असेल तर ते पूर्णपणे बंद करा अन्यथा ते करू नका," असेही शाहिद आफ्रिदीने म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShahid Afridiशाहिद अफ्रिदीPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान