शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी; BJP प्रवक्त्याचं विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 23:19 IST

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे.

नवी दिल्ली - भाजपा प्रवक्त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे जगभर पडसाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये हा वाद पोहचला आहे. याठिकाणी बाजारातून भारतीय उत्पादनावर बंदी आणली आहे. 

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे. सौदी अरब, कतार यासह अनेक देशांनी भाजपा प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध केला आहे. कुवेत शहराच्या अगदी बाहेर सुपरमार्केटमध्ये, तांदळाची पोती, मसाले आणि मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेले होते. त्यावर अरबी भाषेत 'आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत' असे लिहिले आहे. "कुवैती मुस्लिम म्हणून आम्ही पैगंबर मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही," असे स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल-मुतारी यांनी एएफपीला सांगितले. बहिष्काराचा कंपनी स्तरावर विचार केला जात आहे असं सुपरमार्केट स्टोअरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलेरविवारी भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि शर्मा यांचे विचार पक्षाशी जुळत नसल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी ट्विटरवर म्हटले होते की, त्यांचे हे वक्तव्य भगवान शिवाच्या अपमानाला प्रत्युत्तर आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे विधान बिनशर्त मागे घेते असे त्या म्हणाल्या. 

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय? आखाती देशांचं भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जीसीसी देश परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर भारतीय तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि फायनान्सशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यात यूएई आणि सौदी अरेबियाचा सर्वाधिक सहभाग आहे. याशिवाय आखाती देशांना भौगोलिक राजकीय महत्त्व आहे. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचतो, तर ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर आपली पकड कायम ठेवतो. ओमानमध्ये भारताचे तीन नौदल तळ आणि एक एअरबेस आहे.

टॅग्स :BJPभाजपा