शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी; BJP प्रवक्त्याचं विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 23:19 IST

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे.

नवी दिल्ली - भाजपा प्रवक्त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे जगभर पडसाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये हा वाद पोहचला आहे. याठिकाणी बाजारातून भारतीय उत्पादनावर बंदी आणली आहे. 

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे. सौदी अरब, कतार यासह अनेक देशांनी भाजपा प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध केला आहे. कुवेत शहराच्या अगदी बाहेर सुपरमार्केटमध्ये, तांदळाची पोती, मसाले आणि मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेले होते. त्यावर अरबी भाषेत 'आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत' असे लिहिले आहे. "कुवैती मुस्लिम म्हणून आम्ही पैगंबर मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही," असे स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल-मुतारी यांनी एएफपीला सांगितले. बहिष्काराचा कंपनी स्तरावर विचार केला जात आहे असं सुपरमार्केट स्टोअरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलेरविवारी भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि शर्मा यांचे विचार पक्षाशी जुळत नसल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी ट्विटरवर म्हटले होते की, त्यांचे हे वक्तव्य भगवान शिवाच्या अपमानाला प्रत्युत्तर आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे विधान बिनशर्त मागे घेते असे त्या म्हणाल्या. 

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय? आखाती देशांचं भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जीसीसी देश परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर भारतीय तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि फायनान्सशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यात यूएई आणि सौदी अरेबियाचा सर्वाधिक सहभाग आहे. याशिवाय आखाती देशांना भौगोलिक राजकीय महत्त्व आहे. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचतो, तर ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर आपली पकड कायम ठेवतो. ओमानमध्ये भारताचे तीन नौदल तळ आणि एक एअरबेस आहे.

टॅग्स :BJPभाजपा