शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी; BJP प्रवक्त्याचं विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 23:19 IST

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे.

नवी दिल्ली - भाजपा प्रवक्त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे जगभर पडसाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये हा वाद पोहचला आहे. याठिकाणी बाजारातून भारतीय उत्पादनावर बंदी आणली आहे. 

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे. सौदी अरब, कतार यासह अनेक देशांनी भाजपा प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध केला आहे. कुवेत शहराच्या अगदी बाहेर सुपरमार्केटमध्ये, तांदळाची पोती, मसाले आणि मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेले होते. त्यावर अरबी भाषेत 'आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत' असे लिहिले आहे. "कुवैती मुस्लिम म्हणून आम्ही पैगंबर मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही," असे स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल-मुतारी यांनी एएफपीला सांगितले. बहिष्काराचा कंपनी स्तरावर विचार केला जात आहे असं सुपरमार्केट स्टोअरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलेरविवारी भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि शर्मा यांचे विचार पक्षाशी जुळत नसल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी ट्विटरवर म्हटले होते की, त्यांचे हे वक्तव्य भगवान शिवाच्या अपमानाला प्रत्युत्तर आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे विधान बिनशर्त मागे घेते असे त्या म्हणाल्या. 

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय? आखाती देशांचं भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जीसीसी देश परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर भारतीय तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि फायनान्सशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यात यूएई आणि सौदी अरेबियाचा सर्वाधिक सहभाग आहे. याशिवाय आखाती देशांना भौगोलिक राजकीय महत्त्व आहे. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचतो, तर ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर आपली पकड कायम ठेवतो. ओमानमध्ये भारताचे तीन नौदल तळ आणि एक एअरबेस आहे.

टॅग्स :BJPभाजपा