शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:44 IST

Coal india : ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे.

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून कोळसा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. वीज संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. भारतासह जागतिक पातळीवर हे संकट आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारने अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, देशात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची भीती असताना केंद्र सरकारने कोळशाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही कोळसा संकट ही अफवा असल्याचं म्हटलंय.  

देशात "कोळशाचा पुरवठा सुरू आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा असेल," अशी माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. आता, निर्मला सितारमण यांनीही हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. देशात कोळशाची कमतरता नाही, भारत एक पॉवर सरप्लस देश आहे, असे सितारमण यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड कॅनेडी स्कूलमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली. हॉवर्ड येथील प्राध्यापक लॉरेंस समर्स यांनी भारतातील कोळशाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारल होता. त्यावेळी, उत्तर देताना निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली. 

ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर, कोळसा पुरवठ्याची साखळीही अखंडीत सुरू आहे. देशातील वीजनिर्मित्ती सक्षम आणि परिपूर्ण असून भारत सरप्लस देश आहे, असेही सितारमण यांनी म्हटलं. 

काय म्हणाले ऊर्जामंत्री

"कोल इंडियाने सोमवारी १९.४ लाख टन कोळसा पुरवठा केला आहे. घरगुती कोळशाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरवठा आहे. तेथे १५-२० दिवसांचा कोळसा साठा होता, तो खाली आला आहे. पण आता कोळशाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही," असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. "अतिवृष्टीमुळे कोळसा उत्पादनाच्या कामावर परिणाम झाला. याशिवाय आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने देशांतर्गत कोळशावर दबाव वाढला. ज्या वीज प्रकल्पांनी त्यांचे उत्पादन थांबवले किंवा कमी केले ते आयात होणाऱ्या कोळशावर अवलंबून होते," असंही जोशी यांनी सांगितलं.

नियमानुसार २० दिवसांच साठा असावा

केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या (CEA) अहवालानुसार, २७ वीज प्रकल्पांमध्ये एक दिवसाचा कोळसा साठा आहे, २० वीज प्रकल्पांमध्ये दोन दिवसांचा आणि २१ वीज प्रकल्पांमध्ये तीन दिवसांचा कोळशाचा साठा आहे. तसंच २० वीज प्रकल्पांमध्ये ४ दिवसांचा साठा आहे, पाच प्रकल्पांमध्ये पाच दिवसांचा आणि आठ वीज प्रकल्पांमध्ये सहा दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही वीज प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा नाही, असं यात नमूद करण्यात आलं आहे. नियमानुसार, किमान २० दिवसांचा साठा असणं आवश्यक आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoal Shortageकोळसा संकटministerमंत्री