शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:42 IST

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे.

सुदानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध आता एका निर्णायक वळणावर जाऊन पोहोचले आहे. या गृहयुद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. आता, सुदानच्या लष्कराने शुक्रवारी (२१ मार्च २०२५) राजधानी खार्तूममधील राष्ट्रपती भवनावर पुन्हा कब्जा केल्याची घोषणा केली. हे सैन्य आता पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) च्या सदस्यांचा शोध घेत आहे. 

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे. येथे सुरू असलेल्या या गृहयुद्धात एकाबाजूला सुदानचे सैन्य, तर दुसऱ्याबाजूला आरएसएफ यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोघांचाही हेतू सुदानची सत्ता मिळवणे असा आहे.

राजवाड्यावर कब्जा म्हणजे सुदान लष्कराचा मोठा विजय - राजवाड्यावर पुन्हा एकदा कब्जा मिळवणे हा सुडान लष्करासाठी एक मोठा विजय आहे. कारण, युद्धाच्या सुरुवातीला अर्थात एप्रिल २०२३ मध्ये खार्तुमचा अधिकांश भाग हा आरएसएफच्या ताब्यात गेला होता. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वीच, "आम्ही राजवाड्यापासून माघार, असे समजू नका," असे, आरएसएफ नेते जनरल मोहम्मद हमदान दगालो यांनी म्हटले होते.

सुदानच्या सैनिकांनी साजरा केला विजय -दरम्यान, सुदानचे सैनिक आणि सहकारी मिलिशियांनी हळूहळू शहराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागावर कब्जा केला आणि आपल्या लक्ष्यांवर मोठा हल्ला केला. गुरुवारी सकाळच्या सुमारास लष्कराने राजवाड्याच्या दक्षिणेकडे आरएसएफच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावेळी, आरएसएफ सैनिक पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. यानंतर, शुक्रवारी (२१ मार्च २०२५) सैन्यासोबत लढणाऱ्या सुदानी मिलिशिया सैनिकांनी विजय साजरा केला.

टॅग्स :Soldierसैनिक