शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:27 IST

यातील विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात

बीजिंग : भगवद्गीता ही ‘ज्ञानाचे अमृत’ व ‘भारतीय संस्कृतीचा लघु इतिहास’ आहे. जी आधुनिक काळात लोकांना भेडसावणाऱ्या आध्यात्मिक, भौतिक समस्यांची उत्तरे देते, असे मत  चीनमधील विद्वानांनी व्यक्त केले आहे. भारतीय दूतावासाच्या वतीने बीजिंग येथे आयोजित ‘संगमम् - अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स’ परिसंवादात चीनमधील अनेक तज्ज्ञांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर  मते मांडली. ‘तत्त्वचिंतनाचा विश्वकोश’ असे गीतेचे वर्णन करत, यातील कालातीत विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात, असे सांगितले. 

गीतेमधून मानवी अस्वस्थता, संभ्रमाला उत्तर

झेजियांग विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर ओरिएंटल फिलॉसॉफी रिसर्च’चे संचालक प्रा. वांग झी-चेंग यांनी गीतेला ‘ज्ञानाचे अमृत’ म्हटले, “पाच हजार वर्षांपूर्वी रणांगणावर झालेला हा संवाद आजही मानवी अस्वस्थता आणि संभ्रमांना उत्तर देतो,” असे ते म्हणाले.

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात श्रीकृष्णाचा प्रभाव

या परिसंवादातील प्रमुख वक्ते होते ८८ वर्षीय प्रा. झांग बाओशेंग. त्यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषांतर केले आहे. ते म्हणाले,“भगवद्गीता भारताच्या आत्मिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. कर्तव्य, कृती आणि वैराग्य या संकल्पना आजही भारतीय जीवनाचे केंद्र आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात मला श्रीकृष्णाचा सजीव प्रभाव जाणवला.”

भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा

शेंझेन विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडियन स्टडीज’चे संचालक प्रा. यू लाँग्यु यांनी म्हटले की, “भारत हा महान संस्कृतीचा देश असून त्याचा तात्त्विक वारसा फार सखोल आहे.

चीनमधील विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा, त्यातून दोन्ही देशांतील समन्वय आणि जागतिक शांततेस हातभार लागेल.”  परिसंवादात स्वागत करताना भारतीय राजदूत प्रदीपकुमार रावत म्हणाले की, “ही परिषद रामायण परिसंवादाचा पुढचा टप्पा आहे.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagavad Gita: Chinese scholars hail it as 'elixir of knowledge'.

Web Summary : Chinese scholars at a Beijing symposium lauded the Bhagavad Gita as an 'elixir of knowledge' and a guide to resolving modern spiritual and material problems. They emphasized its timeless wisdom and relevance to achieving balance in life, noting its profound influence on Indian culture.
टॅग्स :chinaचीन