शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 19:41 IST

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही.

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. चीनचं सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मधून (Global Times) तर आता थेट भारताला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. युद्ध झालंच तर भारताचा पराभव निश्चित आहे, असं 'ग्लोबल टाइम्स'मध्ये दावा करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दल आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत भारतानं सुचवलेल्या मुद्द्यांवर चीनकडून सहमती मिळू शकली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम आहे. 

''भारतानं एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की ज्यापद्धतीनं त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचं आहे ते प्रत्यक्षात होणं शक्य नाही. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर निश्चित स्वरुपात भारतानं पराभवासाठी तयार राहावं", असं 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकीय लेखात नमूद करण्यात आलं आहे. भारत आणि चीनमधील सीमावाद अजूनही कायम असून यामागे भारतीय बाजूनं संवादात चुकीची भूमिका हे कारण आहे. भारताच्या मागण्या वास्तविक पातळीवर अव्यवहारिक आहेत, असंही चीननं म्हटलं आहे. 

दोन्ही देशांमध्ये तब्बल ८ तास चर्चादोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) चूशुल-मोल्दो सीमा क्षेत्र परिसरात पार पडली.  कॉर्प्स कमांडर लेफ्टिनंट जनरल पीजीके मेनन आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियु लिन यांच्या नेतृत्त्वात दोन्ही देशांमध्ये जवळपास साठेआठ तास चर्चा झाली. 

चीनी सैनिकांकडून रास्तारोकोदेपसॉन्ग बुल्ज परिसरात काही ठिकाणांवर भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय सैनिकांना गेल्या वर्षापासूनच पारंपारिक पेट्रोलिंग पॉइंट असलेल्या पीपी-१०,११,११ए आणि १३ सोबतच देमचॉक सेक्टरमधील ट्रॅक जंक्शन चार्डिंग निंगलुंग नाला (CNN) पर्यंत पोहोचू दिलं जात नाहीय. चीनी सैनिकांनी या मार्गांमध्ये रास्ता रोको केलं आहे. 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगNarendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणाव