शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

चीनची भिंत आली आडवी

By admin | Updated: June 25, 2016 03:15 IST

एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही.

सेऊल : एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही. चीनने खोडा घातल्याने आणि अन्य काही देश भारताच्या विरोधात गेल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले. अर्थात, भारताने नाव न घेता यासाठी चीनला जबाबदार ठरविले आहे. एका देशाने सातत्याने अडथळे निर्माण केल्याने हे प्रयत्न यशस्वी झाले नसल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता. एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही. चीनच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनच्या राष्ट्रपतींची गुरुवारी ताश्कंदमध्ये भेट घेतली होती. मात्र प्रयत्नांना यश आले नाही आणि चीनची विरोधाची भूमिका कायम राहिली. एनएसजीच्या गुरुवारी सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीचा येथे शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर परराष्ट्र विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री सदस्यत्व व एनपीटीच्या मुद्यावर आम्ही तीन तास चर्चा केली; पण एका देशाने या प्रकरणात अडथळे आणले. (वृत्तसंस्था)एनएसजीने यासंबंधात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, भारताच्या बाबतीत कुठलाही ‘अपवाद’ होणार नाही. तथापि, ही चर्चा पुढेही चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताने एनपीटीवर (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) स्वाक्षरी केलेली नसल्याने चीन आणि अन्य काही देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला. अर्थात भारताला सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर यापुढेही चर्चा होत राहील.