शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:22 IST

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे.

बीजिंग - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण सज्जतेचा आढावा घेण्यासाठी रविवारी अरुणाचल प्रदेशमधील अंजा जिल्ह्याचा दौरा केला होता.  सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, "चीन आणि भारताच्या सीमेवरील पूर्वेकडील एका प्रदेशाबाबत विवाद सुरू आहे. या विवादित भागात भारताकडून करण्यात आलेला हा दौरा संबंधित भागातील शांततेसाठी प्रतिकूल आहे."चर्चेद्वारे सीमाविदाद सोडवण्यासाठी भारतीय पक्षकारांनी चीनी पक्षकारांसोबत काम केले पाहिजे. भारत हा मुद्दा सोडवण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा स्वीकार्ह तोडगा निघेल आणि आमच्या चिंतेचे निराकरण होईल, अशी भूमिका भारताची असेल, असी अपेक्षा चीनच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली.  अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात सिक्किममधील भारत आणि चीन सीमेजवळील. नथू ला भागाचा दौऱा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.   

मनिलामध्ये होणा-या पूर्व आशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. हे चार देश एकत्र येत असल्याने चीन सध्या चिंतेमध्ये आहे. आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना झाली आहे. जवळपास दशकभरापासून या चार देशांमध्ये खंडीत झालेली चर्चा पुन्हा सुरु होणार आहे. येत्या 13 नोव्हेंबरला मनिलामध्ये पूर्व आशिया परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहू शकतात. 

या बैठकीमुळे कुठल्या तिस-या पक्षाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश