शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

विवाद सुरू असतानाही चीनचा नवा सीमा कायदा, तणावात भर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:07 IST

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल.

बीजिंग : भारताशी सीमातंट्यावरून तणाव निर्माण झालेला असूनही चीनने पुन्हा एक आगळीक केली आहे. चीनने स्वत:च्या सीमांचे रक्षण करण्यासाठी एक नवीन कायदा संमत केला आहे. त्यामुळे सीमावादात भर पडण्याचीच शक्यता आहे.चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल. चीनचे सार्वभौमत्व व सीमा सुरक्षित राखणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आमच्यावर कोणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा नवा कायदा करण्यात आला आहे, असे चीनने म्हटले आहे.चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने उधळून लावला होता. चीनने शनिवारी मंजूर केलेल्या नव्या कायद्यात म्हटले आहे की, सीमा अधिक बळकट करण्यासाठी चीन सर्व प्रकारची उपाययोजना करणार आहे. सीमाभागातील लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच सीमाभागात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जात आहे. शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राखण्याचे चीनचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे चीनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

चीनचा १२ देशांशी सीमातंटाभारत व भूतान या दोन देशांशी सीमानिश्चितीबाबत चीनने अद्याप करार केलेला नाही. भूतानशी सीमातंट्याबाबत तीन टप्प्यांत चर्चा करून तोडगा काढण्याच्या संदर्भात चीनने नुकताच त्या देशाशी करार केला आहे. चीनची भूमिका कायम विस्तारवादी राहिली आहे. त्यामुळे त्याचे १२ देशांशी सीमातंटे सुरू आहेत. त्यामध्ये रशिया, मंगोलिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, भारत, भूतान, आदी देशांचा समावेश आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत