शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विवाद सुरू असतानाही चीनचा नवा सीमा कायदा, तणावात भर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:07 IST

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल.

बीजिंग : भारताशी सीमातंट्यावरून तणाव निर्माण झालेला असूनही चीनने पुन्हा एक आगळीक केली आहे. चीनने स्वत:च्या सीमांचे रक्षण करण्यासाठी एक नवीन कायदा संमत केला आहे. त्यामुळे सीमावादात भर पडण्याचीच शक्यता आहे.चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल. चीनचे सार्वभौमत्व व सीमा सुरक्षित राखणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आमच्यावर कोणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा नवा कायदा करण्यात आला आहे, असे चीनने म्हटले आहे.चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने उधळून लावला होता. चीनने शनिवारी मंजूर केलेल्या नव्या कायद्यात म्हटले आहे की, सीमा अधिक बळकट करण्यासाठी चीन सर्व प्रकारची उपाययोजना करणार आहे. सीमाभागातील लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच सीमाभागात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जात आहे. शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राखण्याचे चीनचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे चीनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

चीनचा १२ देशांशी सीमातंटाभारत व भूतान या दोन देशांशी सीमानिश्चितीबाबत चीनने अद्याप करार केलेला नाही. भूतानशी सीमातंट्याबाबत तीन टप्प्यांत चर्चा करून तोडगा काढण्याच्या संदर्भात चीनने नुकताच त्या देशाशी करार केला आहे. चीनची भूमिका कायम विस्तारवादी राहिली आहे. त्यामुळे त्याचे १२ देशांशी सीमातंटे सुरू आहेत. त्यामध्ये रशिया, मंगोलिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, भारत, भूतान, आदी देशांचा समावेश आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत