शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनची पुन्हा मग्रूर चाल; अरुणाचलमधील ११ ठिकाणांची नावे बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 11:21 IST

भारताचे चोख प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलण्याचा खोडसाळपणा पुन्हा एकदा केला आहे. चीनच्या या कृत्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. चीनचा असा खोडसाळपणा आम्ही यापूर्वीही पाहिला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अशा प्रकारे नाव बदलून वास्तव बदलणार नाही, अशा कठोर शब्दांत भारताने चीनला फटकारले आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नुसार, सोमवारी चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचलमधील ११ ठिकाणांच्या नाव बदलाला मंजुरी दिली. हे सर्व क्षेत्र जेंगनेन (चीनच्या दक्षिणेकडील शिजियांग प्रांताचा भाग) अंतर्गत येतात. त्यापैकी ४ निवासी क्षेत्रे आहेत. यापैकी एक भाग अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून अगदी जवळ आहे. ५ डोंगराळ भाग आणि दोन नद्या आहेत. चीनने या भागांना मंदारिन आणि तिबेटी भाषांमध्ये नावे दिली आहेत.

भारताने दिलेली नावे - चीनने बदललेली नावे

  • पांगचेन - बांगकिन
  • ग्यांर खार जोंग - जिआंगकाजोंग
  • लो जुगरी - लुओसू री 
  • तायपोरी - दियेपू री 
  • ताडोंग - डाडोंग
  • चेनपोरी चू - किबुरी हे 
  • डुंगसेल - डोंगजिला फेंग 
  • ग्येडूचू - गेदुओ हे 
  • घोयूल थांग - गुयुतोंग 
  • नीमा गैंगै - निमागैंगफेंग
  • चुंगन्यू साई गांगरी - जिउनिउजे गांगरी

सध्या पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांकडून सैन्य तैनात आहेत.

२०१७ मध्ये काय? - चीनने अरुणाचल मधील सहा ठिकाणांची नावे बदलली होती.

२०२१ मध्ये काय झाले होते? - चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे बदलली होती. यापैकी ८ निवासी क्षेत्रे, ४ पर्वत, २ नद्या आणि एक डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग होता.

खोटी नाव ठेवून वास्तव बदलणार नाही. असे अहवाल आम्ही यापूर्वीही पाहिले आहेत. चीनने असा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही ही नावे पूर्णपणे नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य होता, आहे आणि राहील. अशा प्रकारे नाव बदलून वास्तव बदलणार नाही. -अरिंदम बाग, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

‘क्लीन चिट’ दिल्याची किंमत मोजावी लागतेय!

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे नामांतर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवले आहे. काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी जून २०२० मध्ये चीनला क्लीन चिट दिली होती. आता त्याची किंमत मोजावी लागत आहे. चीनचे सैन्य देसपांग क्षेत्रात भारताचे गस्तीचे अधिकार नाकारत आहे. यापूर्वी भारताला या भागात कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश होता.

चीनच्या मुद्यावर पंतप्रधानांचे मौन हे उत्तर नाही. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये हा कुणाचा बेनामी पैसा आहे- पंतप्रधान गप्प, उत्तर नाही! चीनने २००० चौरस किलोमीटर जमीन हिसकावून घेतली, ठिकाणांची नावेही बदलतोय, पंतप्रधान गप्प आहेत, उत्तर नाही! पंतप्रधान, एवढी भीती कशाची? -राहुल गांधी, काँग्रेस

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश