शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मोदी सरकारच्या 'या' रिपोर्टवर चीननं उभे केले प्रश्नचिन्ह; ड्रॅगनचा भलताच दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:33 IST

चीन गेल्या अनेक वर्षापासून भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. परंतु नवीन आकडेवारीनुसार, आता अमेरिकेने चीनला मागे टाकल्याचं सांगण्यात आले.

नवी दिल्ली - अलीकडेच भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक भागीदारी वाढल्याचा रिपोर्ट समोर आला होता. मात्र या रिपोर्टच्या आकडेवारीवर चीननं प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. अमेरिका नव्हे तर चीनचभारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचं चीननं दावा केला आहे. भारतासोबत व्यापार वाढवण्यासाठी सर्व उपाय करण्यासाठी तयारी आहे असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारतानं अन्य देशाच्या तुलनेत अमेरिकेसोबत सर्वाधिक व्यापार केल्याचं अर्थ मंत्रालयाच्या डेटामध्ये म्हटलं होतं. त्यावर चीननं उलटा दावा केला आहे. 

चीन गेल्या अनेक वर्षापासून भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. परंतु नवीन आकडेवारीनुसार, आता अमेरिकेने चीनला मागे टाकल्याचं सांगण्यात आले. आर्थिक वर्ष २०२१-२२ या काळात अमेरिकेने चीनला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार बनला. २०२१-२२ या वर्षात अमेरिका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापार वाढून ११९.४२ अब्ज डॉलर इतका झाला. तर २०२०-२१ या काळात हा व्यापार ८०.५१ अब्ज डॉलर होता. परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या काळात भारत आणि त्यांच्यात १२५.६६ अब्ज डॉलर व्यापार झाला असून चीन भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केला आहे. 

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक भागीदारीबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. अशाप्रकारे डेटा गोळा करण्याबाबत काही पद्धतीत अंतर असल्यानं हे कारण आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी जी आकडेवारी जारी केली. त्यात २०२१ मध्ये चीन आणि भारत यांच्या द्विपक्षीय १२५.६६ अब्ज डॉलर व्यापार झाला. या आधारावर चीन भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशात पहिल्यांदाच व्यापार १०० अब्ज डॉलरच्या वर पोहचला आहे. डेटा जमा करण्याच्या पद्धतीत अंतर असल्याने भारत आणि चीन यांच्या आकडेवारीत फरक असू शकेल असं चीननं म्हटलं आहे. 

२०२१ मध्ये भारत चीन यांच्यात १२५.६६ अब्ज डॉलर व्यवसाय झाला. जो २०२० मधील व्यापाराच्या तुलनेत ४३.३ टक्क्यांनी अधिक होता. वर्ष २०२० मध्ये भारत-चीन यांच्यात ८७.६ अब्ज डॉलर व्यवसाय झाला. २०२१ मध्ये पूर्व लडाख येथे सीमेवर तणाव असताना दोन्ही देशातील व्यापार वाढला होता. परंतु हा व्यापार चीनच्या बाजूने होता. भारत-चीन यांच्यातील व्यापार कोविड महामारीमुळे वाढल्याची स्थिती होती. कोविड महामारीत भारताने चीनकडून अधिक प्रमाणात वैद्यकीय उपकरणं मागवली होती. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका