शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:02 IST

China India Conflict : चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

नवी दिल्ली : चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आता चीननेभारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. वॉशिंग्टन थिंक टँक सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CSIS) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. 

चीन हिमालयातील भारतासोबतच्या विवादित सीमेवरील शेकडो गावे वसवत असल्याचे १६ मे रोजी सीएसआयएसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टमध्ये सॅटेलाइट फोटोंचा हवाला देण्यात आला आहे. यामध्ये २०२२ ते २०२४ च्या फोटोंची तुलना करण्यात आली. चीनने गेल्या ४ वर्षात ६२४  गावे बांधली आहेत.

सीएसआयएस अहवालात म्हटले आहे की, २०१८ ते २०२२ दरम्यान चीनने ६२४ गावे बांधली आहेत आणि त्यांचे काम सुरू आहे. अरुणाचल प्रदेशाजवळ ४ वेगवेगळ्या ठिकाणी ही गावे वसवली जात आहेत. अरुणाचल हा भारताचा भाग आहे, तर चीनकडून हा आपला भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. या वसवलेल्या गावांमध्ये गुप्तपणे सैनिक तैनात केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारत आणि चिनी सैनिकांमध्ये सीमा वादावरून संघर्ष होताना दिसतो. डिसेंबर २०२० मध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. तसेच, १९६२ मध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवरून युद्ध झाले होते. गेल्या ३ वर्षात चकमकीही पाहायला मिळाल्या आहेत. सीमावादावर कोणताही स्पष्ट तोडगा निघालेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

चीन बदलतोय डेमोग्राफीसीमेजवळ वेगाने होत असलेला विकास चीनच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेचा दाखला आहे. गेल्या वर्षी याराओ जवळ नवीन रस्ता आणि दोन हेलिपॅडही बांधण्यात आले. तसेच, याराओ येथे ३९०० मीटर उंचीवर असलेल्या नवीन इमारती बांधण्यातही चीनला यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिबेटी आणि हान लोकसंख्येबाबत चीनही वेगळा दृष्टिकोन दाखवत आहे.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगIndiaभारत