शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

चीनची नवी चाल उघड, हिंदी समजणाऱ्या तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:58 IST

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे.

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे. नेपाळी आणि तिबेटी लोक ज्यांना हिंदीचं ज्ञान आहे अशा लोकांकडून भारतीय लष्कराचं इंटरसेप्टेड वायरलेस संदेश आणि इतर गुप्तचर संदेश समजून घेऊन त्यांची माहिती देणं असा यामागचा चीनचा उद्देश आहे. गलवान हिंसाचारानंतर चीन आणि भारत यांच्यातील संबंध खूपच बिघडले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी काम केलं जात होतं. त्यातच ९ डिसेंबरला पीएलएने (चीनी लष्कर) अरुणाचलमधील तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

चीनमधील लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेशिवाय इतर भाषा माहित नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आता चीनच्या गुप्तचर विभागात नेपाळी आणि तिबेटी लोकांची भरती केली जात आहे, ज्यासाठी त्यांना हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना भारतीय लष्कराचा संदेश सहज समजू शकेल. बहुतेक वेळी चिनी सैन्याला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीची उकल करण्यात भाषेमुळे अडचणी येतात.

भारतीय मेसेज डीकोड करण्यासाठी भरतीज्यांची नियुक्ती केली जाईल त्यांच्याकडून भारतीय भाषेतील मेसेज त्वरित समजून घेतला जाईल. जेणेकरून पुढील कारवाई करण्यात मदत होईल असा चीनचा यामागचा उद्देश आहे. भारतीय लष्कराच्या गटाचे म्हणणे ऐकणे आणि ते चिनी सैन्याला सांगणे हा या भरतीचा उद्देश आहे. चिनी सैन्य तिबेट स्वायत्त प्रदेश TAR मध्ये ही भरती करत आहे. भरती झालेले सर्व लोक भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात राहणार आहेत. हा भाग नेपाळपासून लडाखपर्यंत येतो.

राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिले९ डिसेंबर रोजी गस्तीदरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एकही सैनिक गंभीर जखमी झाला नाही. 

"जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही", असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. संसदेत विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली.

टॅग्स :chinaचीन