शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चीनची नवी चाल उघड, हिंदी समजणाऱ्या तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:58 IST

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे.

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे. नेपाळी आणि तिबेटी लोक ज्यांना हिंदीचं ज्ञान आहे अशा लोकांकडून भारतीय लष्कराचं इंटरसेप्टेड वायरलेस संदेश आणि इतर गुप्तचर संदेश समजून घेऊन त्यांची माहिती देणं असा यामागचा चीनचा उद्देश आहे. गलवान हिंसाचारानंतर चीन आणि भारत यांच्यातील संबंध खूपच बिघडले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी काम केलं जात होतं. त्यातच ९ डिसेंबरला पीएलएने (चीनी लष्कर) अरुणाचलमधील तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

चीनमधील लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेशिवाय इतर भाषा माहित नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आता चीनच्या गुप्तचर विभागात नेपाळी आणि तिबेटी लोकांची भरती केली जात आहे, ज्यासाठी त्यांना हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना भारतीय लष्कराचा संदेश सहज समजू शकेल. बहुतेक वेळी चिनी सैन्याला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीची उकल करण्यात भाषेमुळे अडचणी येतात.

भारतीय मेसेज डीकोड करण्यासाठी भरतीज्यांची नियुक्ती केली जाईल त्यांच्याकडून भारतीय भाषेतील मेसेज त्वरित समजून घेतला जाईल. जेणेकरून पुढील कारवाई करण्यात मदत होईल असा चीनचा यामागचा उद्देश आहे. भारतीय लष्कराच्या गटाचे म्हणणे ऐकणे आणि ते चिनी सैन्याला सांगणे हा या भरतीचा उद्देश आहे. चिनी सैन्य तिबेट स्वायत्त प्रदेश TAR मध्ये ही भरती करत आहे. भरती झालेले सर्व लोक भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात राहणार आहेत. हा भाग नेपाळपासून लडाखपर्यंत येतो.

राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिले९ डिसेंबर रोजी गस्तीदरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एकही सैनिक गंभीर जखमी झाला नाही. 

"जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही", असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. संसदेत विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली.

टॅग्स :chinaचीन