शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर चीन आला वठणीवर, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- चर्चेने वाद सोडवूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 5:47 PM

PM Modi, India vs China: चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबाबत पंतप्रधान मोदींनी रोखठोक विधान केले होते. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालय सुतासारखं सरळ झाल्याचे दिसतेय.

PM Modi India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. तशातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सीमावादाच्या दरम्यान भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. तसेच, या चर्चांचे योग्य व्यवस्थापन आणि देखभाल करण्याच्या उपयुक्ततेवरही भर दिला.

चीनची ही प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर आली आहे. भारतासोबतचे चीनचे संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मिळून सीमावादावर चर्चेतून तोडगा काढला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता दोन्ही देश राजकीय आणि लष्करी माध्यमातून चर्चा करत राहिले पाहिजेत, यावर चीनकडून भर देण्यात आला आहे. माओ निंग यांनी आशा व्यक्त केली की भारत आणि चीन परस्पर सहकार्य, संवाद आणि द्विपक्षीय संबंध मजबूतपणे पुढे नेण्यासाठी मतभेद दूर करण्यासाठी एकत्र काम करतील.

चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या

५ मे २०२० रोजी सुरू झालेल्या स्थितीमुळे दोन्ही बाजूंमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या आहेत. चिनी लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत गलवान व्हॅली, पँगॉन्ग लेक, हॉट स्प्रिंग्स आणि जियानान डबानमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. तथापि, चीनसोबतच्या संबंधांमध्ये सामान्यता आणण्यासाठी सीमा जैसे थे करणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत भारताने इतर भागातही चीनचे अधिकचे सैन्य मागे घेण्यावर दबाव आणला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान