शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर चीन आला वठणीवर, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- चर्चेने वाद सोडवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 17:49 IST

PM Modi, India vs China: चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबाबत पंतप्रधान मोदींनी रोखठोक विधान केले होते. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालय सुतासारखं सरळ झाल्याचे दिसतेय.

PM Modi India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. तशातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सीमावादाच्या दरम्यान भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. तसेच, या चर्चांचे योग्य व्यवस्थापन आणि देखभाल करण्याच्या उपयुक्ततेवरही भर दिला.

चीनची ही प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर आली आहे. भारतासोबतचे चीनचे संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मिळून सीमावादावर चर्चेतून तोडगा काढला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता दोन्ही देश राजकीय आणि लष्करी माध्यमातून चर्चा करत राहिले पाहिजेत, यावर चीनकडून भर देण्यात आला आहे. माओ निंग यांनी आशा व्यक्त केली की भारत आणि चीन परस्पर सहकार्य, संवाद आणि द्विपक्षीय संबंध मजबूतपणे पुढे नेण्यासाठी मतभेद दूर करण्यासाठी एकत्र काम करतील.

चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या

५ मे २०२० रोजी सुरू झालेल्या स्थितीमुळे दोन्ही बाजूंमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या आहेत. चिनी लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत गलवान व्हॅली, पँगॉन्ग लेक, हॉट स्प्रिंग्स आणि जियानान डबानमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. तथापि, चीनसोबतच्या संबंधांमध्ये सामान्यता आणण्यासाठी सीमा जैसे थे करणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत भारताने इतर भागातही चीनचे अधिकचे सैन्य मागे घेण्यावर दबाव आणला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान