शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर चीन आला वठणीवर, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- चर्चेने वाद सोडवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 17:49 IST

PM Modi, India vs China: चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबाबत पंतप्रधान मोदींनी रोखठोक विधान केले होते. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालय सुतासारखं सरळ झाल्याचे दिसतेय.

PM Modi India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. तशातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सीमावादाच्या दरम्यान भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. तसेच, या चर्चांचे योग्य व्यवस्थापन आणि देखभाल करण्याच्या उपयुक्ततेवरही भर दिला.

चीनची ही प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर आली आहे. भारतासोबतचे चीनचे संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मिळून सीमावादावर चर्चेतून तोडगा काढला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता दोन्ही देश राजकीय आणि लष्करी माध्यमातून चर्चा करत राहिले पाहिजेत, यावर चीनकडून भर देण्यात आला आहे. माओ निंग यांनी आशा व्यक्त केली की भारत आणि चीन परस्पर सहकार्य, संवाद आणि द्विपक्षीय संबंध मजबूतपणे पुढे नेण्यासाठी मतभेद दूर करण्यासाठी एकत्र काम करतील.

चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या

५ मे २०२० रोजी सुरू झालेल्या स्थितीमुळे दोन्ही बाजूंमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या आहेत. चिनी लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत गलवान व्हॅली, पँगॉन्ग लेक, हॉट स्प्रिंग्स आणि जियानान डबानमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. तथापि, चीनसोबतच्या संबंधांमध्ये सामान्यता आणण्यासाठी सीमा जैसे थे करणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत भारताने इतर भागातही चीनचे अधिकचे सैन्य मागे घेण्यावर दबाव आणला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान