शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

“मुइज्जू देशहिताचा विचार करतात, भारताने उदार व्हावे”; चीनने केले मालदीवचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:02 IST

INDIA-Maldives Clashes: मालदीव संघर्षावर प्रतिक्रिया देताना चीनने भारतालाच खोचकपणे सल्ला दिला आहे.

INDIA-Maldives Clashes: भारत आणि मालदीवमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मालदीवमधील मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या टीकेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बायकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला असून, चलो लक्षद्वीप ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, यामुळे आता चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावर आहेत. भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवचे समर्थन केले आहे. तसेच भारताबाबत तिरकस विधान केले आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि मालदीवच्या तणावग्रस्त संबंधांवर भाष्य केले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा चीन समर्थक म्हणून उल्लेख करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवले आणि याचे खापर चीनवर फोडू नये, अशी टीका करण्यात आली आहे. 

दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही

चीन हा भारत आणि मालदीवसोबत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने, उदार होऊन विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे उपसंचालक लिन मिनवांग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन आणि भारताची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही गरज नाही. किंबहुना ते आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानून भारत त्याच्यावर दबाव आणू इच्छितो, असा दावा करण्यात आला आहे. 

दरम्यान, सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लॉंग जिंगचुन यांनी म्हटले आहे की, चीन हा मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. त्याच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारताप्रमाणे चीन इतर देशांच्या मालदीवशी असलेल्या संबंधांना विरोध करत नाही. ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने सांगितले की, मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही, असे म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवchinaचीन