शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“मुइज्जू देशहिताचा विचार करतात, भारताने उदार व्हावे”; चीनने केले मालदीवचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:02 IST

INDIA-Maldives Clashes: मालदीव संघर्षावर प्रतिक्रिया देताना चीनने भारतालाच खोचकपणे सल्ला दिला आहे.

INDIA-Maldives Clashes: भारत आणि मालदीवमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मालदीवमधील मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या टीकेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बायकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला असून, चलो लक्षद्वीप ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, यामुळे आता चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावर आहेत. भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवचे समर्थन केले आहे. तसेच भारताबाबत तिरकस विधान केले आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि मालदीवच्या तणावग्रस्त संबंधांवर भाष्य केले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा चीन समर्थक म्हणून उल्लेख करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवले आणि याचे खापर चीनवर फोडू नये, अशी टीका करण्यात आली आहे. 

दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही

चीन हा भारत आणि मालदीवसोबत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने, उदार होऊन विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे उपसंचालक लिन मिनवांग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन आणि भारताची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही गरज नाही. किंबहुना ते आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानून भारत त्याच्यावर दबाव आणू इच्छितो, असा दावा करण्यात आला आहे. 

दरम्यान, सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लॉंग जिंगचुन यांनी म्हटले आहे की, चीन हा मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. त्याच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारताप्रमाणे चीन इतर देशांच्या मालदीवशी असलेल्या संबंधांना विरोध करत नाही. ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने सांगितले की, मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही, असे म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवchinaचीन