शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

“मुइज्जू देशहिताचा विचार करतात, भारताने उदार व्हावे”; चीनने केले मालदीवचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:02 IST

INDIA-Maldives Clashes: मालदीव संघर्षावर प्रतिक्रिया देताना चीनने भारतालाच खोचकपणे सल्ला दिला आहे.

INDIA-Maldives Clashes: भारत आणि मालदीवमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मालदीवमधील मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या टीकेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बायकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला असून, चलो लक्षद्वीप ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, यामुळे आता चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावर आहेत. भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवचे समर्थन केले आहे. तसेच भारताबाबत तिरकस विधान केले आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि मालदीवच्या तणावग्रस्त संबंधांवर भाष्य केले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा चीन समर्थक म्हणून उल्लेख करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवले आणि याचे खापर चीनवर फोडू नये, अशी टीका करण्यात आली आहे. 

दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही

चीन हा भारत आणि मालदीवसोबत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने, उदार होऊन विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे उपसंचालक लिन मिनवांग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन आणि भारताची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही गरज नाही. किंबहुना ते आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानून भारत त्याच्यावर दबाव आणू इच्छितो, असा दावा करण्यात आला आहे. 

दरम्यान, सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लॉंग जिंगचुन यांनी म्हटले आहे की, चीन हा मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. त्याच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारताप्रमाणे चीन इतर देशांच्या मालदीवशी असलेल्या संबंधांना विरोध करत नाही. ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने सांगितले की, मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही, असे म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवchinaचीन