शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 06:32 IST

भारताला हवे कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे पालन

बीजिंग/नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर अलीकडेच वाद व संघर्ष झालेल्या बहुतांश ठिकाणी भारत व चीनने आपापल्या सैन्याची माघार पूर्ण केल्याचा दावा चीनने केला असून जे काही वादाचे मुद्दे शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरांच्या पुढील बैठकीची आपण तयारी करीत आहोत, असे म्हटले आहे.

भारताला मात्र चीनचा हा दावा मान्य नसून सैन्य माघारीच्या बाबतीत लष्करी कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे चीनने प्रामाणिकपणे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानेही दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे सैन्य माघारी घेण्यावर भर दिला होता. त्याच दिवशी चीनने बीजिंगमध्ये काढलेल्या निवेदनात सैन्य माघारी घेऊन सीमेवरील तणाव कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक प्रगती झाल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला की, गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व गोगरा या सर्व भागांतून दोन्ही देशांनी सीमेवरील आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे का? यावर वेनबिन यांनी दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांत लष्करी व राजनैतिक पातळीवर झालेल्या अनेक बैठकांचा संदर्भ देत सांगितले की, बहुतांश ठिकाणी दोन्ही सैन्यांची माघार पूर्ण झाली असून त्यामुळे सीमेवरील तणाव कमी व्हायला मदत झाली आहे.

पूर्णपणे माघार घेण्याचा आग्रहदोन्ही देशांमधील सीमाविषयक वादांवर चर्चा व समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायमस्वरूपी व्यवस्थेच्या अंतर्गत भारत व चीनच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली होती.सूत्रांनुसार, आधीच्या चर्चा व बैठकींमध्ये ठरल्यानुसार चीनने सर्व वादग्रस्त ठिकाणांहून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याचा आग्रह या बैठकीत भारताने धरला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव