शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 06:32 IST

भारताला हवे कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे पालन

बीजिंग/नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर अलीकडेच वाद व संघर्ष झालेल्या बहुतांश ठिकाणी भारत व चीनने आपापल्या सैन्याची माघार पूर्ण केल्याचा दावा चीनने केला असून जे काही वादाचे मुद्दे शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरांच्या पुढील बैठकीची आपण तयारी करीत आहोत, असे म्हटले आहे.

भारताला मात्र चीनचा हा दावा मान्य नसून सैन्य माघारीच्या बाबतीत लष्करी कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे चीनने प्रामाणिकपणे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानेही दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे सैन्य माघारी घेण्यावर भर दिला होता. त्याच दिवशी चीनने बीजिंगमध्ये काढलेल्या निवेदनात सैन्य माघारी घेऊन सीमेवरील तणाव कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक प्रगती झाल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला की, गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व गोगरा या सर्व भागांतून दोन्ही देशांनी सीमेवरील आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे का? यावर वेनबिन यांनी दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांत लष्करी व राजनैतिक पातळीवर झालेल्या अनेक बैठकांचा संदर्भ देत सांगितले की, बहुतांश ठिकाणी दोन्ही सैन्यांची माघार पूर्ण झाली असून त्यामुळे सीमेवरील तणाव कमी व्हायला मदत झाली आहे.

पूर्णपणे माघार घेण्याचा आग्रहदोन्ही देशांमधील सीमाविषयक वादांवर चर्चा व समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायमस्वरूपी व्यवस्थेच्या अंतर्गत भारत व चीनच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली होती.सूत्रांनुसार, आधीच्या चर्चा व बैठकींमध्ये ठरल्यानुसार चीनने सर्व वादग्रस्त ठिकाणांहून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याचा आग्रह या बैठकीत भारताने धरला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव