शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 06:32 IST

भारताला हवे कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे पालन

बीजिंग/नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर अलीकडेच वाद व संघर्ष झालेल्या बहुतांश ठिकाणी भारत व चीनने आपापल्या सैन्याची माघार पूर्ण केल्याचा दावा चीनने केला असून जे काही वादाचे मुद्दे शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरांच्या पुढील बैठकीची आपण तयारी करीत आहोत, असे म्हटले आहे.

भारताला मात्र चीनचा हा दावा मान्य नसून सैन्य माघारीच्या बाबतीत लष्करी कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे चीनने प्रामाणिकपणे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानेही दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे सैन्य माघारी घेण्यावर भर दिला होता. त्याच दिवशी चीनने बीजिंगमध्ये काढलेल्या निवेदनात सैन्य माघारी घेऊन सीमेवरील तणाव कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक प्रगती झाल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला की, गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व गोगरा या सर्व भागांतून दोन्ही देशांनी सीमेवरील आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे का? यावर वेनबिन यांनी दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांत लष्करी व राजनैतिक पातळीवर झालेल्या अनेक बैठकांचा संदर्भ देत सांगितले की, बहुतांश ठिकाणी दोन्ही सैन्यांची माघार पूर्ण झाली असून त्यामुळे सीमेवरील तणाव कमी व्हायला मदत झाली आहे.

पूर्णपणे माघार घेण्याचा आग्रहदोन्ही देशांमधील सीमाविषयक वादांवर चर्चा व समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायमस्वरूपी व्यवस्थेच्या अंतर्गत भारत व चीनच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली होती.सूत्रांनुसार, आधीच्या चर्चा व बैठकींमध्ये ठरल्यानुसार चीनने सर्व वादग्रस्त ठिकाणांहून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याचा आग्रह या बैठकीत भारताने धरला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव