शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:29 IST

या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देया कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क : दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक शिरजोर होत असलेला चीन आता दक्षिण चीन समुद्रात वाटमारी करू पहात आहे. दक्षिण चीन समुद्री मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाची तपशीलवार माहिती देण्याचा दंडक चीनने घातला आहे. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला असून सर्वच देशांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

वाद काय?n या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. n कायद्याचे उल्लंघन केल्यास चीनकडून कोणती कारवाई केली जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यातून संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

दक्षिण चीन समुद्राचे महत्त्वn या समुद्री परिसरातून दरवर्षी २८६ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो.n जगभरातून होणाऱ्या सागरी व्यापाराच्या एक तृतियांश हिस्सा या भागातला आहे. 

काय आहे चीनचा कायदा?आपल्या हद्दीतील समुद्राच्या सुरक्षेचे कारण पुढे करत चीनने १ सप्टेंबरपासून नवीन कायदा लागू केला आहे. त्यानुसार दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना आपल्याकडील मालाची तसेच वेग, कोणत्या दिशेने जहाज जाणार आहे ते इत्यादी सर्व बारिकसारिक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचे अधिकार हा कायदा चिनी अधिकाऱ्यांना देतो.चीनचा हा कायदा युद्धसामुग्री घेऊन जाणाऱ्या तसेच तेल, नैसर्गिक वायू आणि रसायने इत्यादींची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर लागू असेल.

 भारतासाठी महत्त्वाचा सागरी मार्गभारताचा ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. त्यापैकी ५५ टक्के व्यापार दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून होतो. या मार्गावरून भारताचाही १३ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो. जूट, चहा, पोलाद, तांबे व चामडे इत्यादी वस्तूंची निर्यात या मार्गाने केली जाते.

टॅग्स :chinaचीनSea Routeसागरी महामार्गIndiaभारत