शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:29 IST

या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देया कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क : दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक शिरजोर होत असलेला चीन आता दक्षिण चीन समुद्रात वाटमारी करू पहात आहे. दक्षिण चीन समुद्री मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाची तपशीलवार माहिती देण्याचा दंडक चीनने घातला आहे. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला असून सर्वच देशांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

वाद काय?n या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. n कायद्याचे उल्लंघन केल्यास चीनकडून कोणती कारवाई केली जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यातून संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

दक्षिण चीन समुद्राचे महत्त्वn या समुद्री परिसरातून दरवर्षी २८६ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो.n जगभरातून होणाऱ्या सागरी व्यापाराच्या एक तृतियांश हिस्सा या भागातला आहे. 

काय आहे चीनचा कायदा?आपल्या हद्दीतील समुद्राच्या सुरक्षेचे कारण पुढे करत चीनने १ सप्टेंबरपासून नवीन कायदा लागू केला आहे. त्यानुसार दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना आपल्याकडील मालाची तसेच वेग, कोणत्या दिशेने जहाज जाणार आहे ते इत्यादी सर्व बारिकसारिक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचे अधिकार हा कायदा चिनी अधिकाऱ्यांना देतो.चीनचा हा कायदा युद्धसामुग्री घेऊन जाणाऱ्या तसेच तेल, नैसर्गिक वायू आणि रसायने इत्यादींची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर लागू असेल.

 भारतासाठी महत्त्वाचा सागरी मार्गभारताचा ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. त्यापैकी ५५ टक्के व्यापार दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून होतो. या मार्गावरून भारताचाही १३ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो. जूट, चहा, पोलाद, तांबे व चामडे इत्यादी वस्तूंची निर्यात या मार्गाने केली जाते.

टॅग्स :chinaचीनSea Routeसागरी महामार्गIndiaभारत