शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चीन पाकवर पुन्हा मेहेरबान; अतिरेक्यावरील निर्बंध रोखले; संयुक्त राष्ट्रांत भारत व अमेरिकेने मांडला हाेता प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 09:45 IST

संयुक्त राष्ट्रांत भारत व अमेरिकेने मांडला हाेता प्रस्ताव

वॉशिंग्टन : पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या अब्दुल रौफ अझर या दहशतवाद्यावर निर्बंध घालण्याच्या भारत व अमेरिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील १५ पैकी १४ सदस्यांनी बुधवारी मंजुरी देण्याचे ठरविले. एकट्या चीननेच या प्रस्तावाला विरोध करून पाकिस्तानची पाठराखण केली. तसेच हा प्रस्ताव राखून ठेवला.

कंदाहार येथे इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणामागे अब्दुल रौफ अझर सूत्रधार होता, असा आरोप आहे. अब्दुल रौफ अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करावे, त्याच्या विदेश प्रवासावर बंदी घालावी, तसेच त्याची मालमत्ता गोठवावी अशा तरतुदी भारत व अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत सादर केलेल्या प्रस्तावात आहेत. या समितीमध्ये १५ सदस्य असून चीन कायमस्वरूपी सदस्य आहे. चीनने व्हेटो वापरून हा प्रस्ताव राखून ठेवला. 

चीनने सांगितले की, सुरक्षा समितीच्या बैठकीत असे अनेक प्रस्ताव याआधी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात अब्दुल रौफ अझरबाबतचा देखील प्रस्ताव आहे. सुरक्षा समितीच्या कामकाजाचे नियम पाळून चीनने या प्रस्तावाबाबत भूमिका घेतली आहे.अब्दुल रौफ अझर या दहशतवाद्यावर अमेरिकेने २०१० सालापासून निर्बंध घातले.

पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी मार्गाकडे वळविण्याचा तसेच भारतात घातपाती हल्ले करण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने अब्दुलवर ठेवला आहे. १९९९ साली कंदाहार येथून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले, २००१ साली भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला, २०१६ रोजी पठाणकोट येथील हवाई दलाच्या छावणीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या कारवायांमागे अब्दुल रौफ अझर हाच सूत्रधार होता, असा आरोप आहे. (वृत्तसंस्था)

चीनवर भारताची तीव्र नाराजी

दहशतवाद्यांशी संबंधित प्रस्ताव सुरक्षा समितीत मांडले गेल्यानंतर ते कोणतेही स्पष्टीकरण न देता राखून ठेवण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी म्हटले होते. हे वक्तव्य म्हणजे भारताने चीनबाबत व्यक्त केलेली नाराजी होती.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत