शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

चिमुकल्या भुतानची भारतावर मदार

By admin | Updated: June 15, 2014 02:52 IST

दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत

थिम्पू : दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला विस्तारवादी बलाढ्य चीनच्या आगळिकींना तोंड देणे भाग असलेल्या भुतानसाठी तर दुसरा शेजारी असलेल्या भारताबरोबरचे नाते संवेदनशील आहे. भारतातल्या राजकीय आणि सामाजिक बदलांचे पडसाद या देशातील समाजजीवनावर फार तातडीने पडतात. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी भुतानला दिलेला अग्रक्रम या देशासाठी मोठा दिलासाच ठरला आहे. थिम्पू, पुनाखा या भागात फिरताना भेटणारे वाहनचालक, गाइड्स, दुकानदार अशी सारीच सर्वसामान्य माणसे भारताबद्दल फार प्रेमाने आणि औत्सुक्याने बोलतात.एरव्ही पश्चिमेकडे नजर लावून असलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला आशियाई स्वाभिमानाची ताकद देणारे पहिले पाऊल नरेंद्र मोदी यांनी थेट शपथविधीच्या दिवशीच उचलले होते. रुढ राजनैतिक संकेत बाजूला ठेवून शपथविधीनंतरच्या शाही खान्याप्रसंगी मोदींनी भुतानचे पंतप्रधान ल्योंंचेन टोग्बे यांना शेजारी सन्मानाने बसवून घेतले होते, याचे दाखले भुतानमधली वर्तमानपत्रे आजही देताना दिसतात. दक्षिण आशियाई राष्ट्र समूहाच्या नेतृत्वाच्या चाव्या हाती ठेवून जागतिक राजकारण-अर्थकारणात भारताचे वर्चस्व सिद्ध करणे, हा नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा पाया असेल, त्यांची भुतान भेट हे त्याचे निदर्शक असल्याचे मत येथील वर्तमानपत्रात व्यक्त होताना दिसते. घनदाट जंगले आणि उत्तुंग हिमालयाच्या बेचक्यातल्या चिमुकल्या भुतानच्या उर्वरित सीमा दोन बलाढ्य शेजाऱ्यांनी घेरून टाकलेल्या आहेत. उत्तरेला चीन आणि दक्षिणेकडे भारत! थिम्पूमध्ये अलीकडेच प्रचंड मोठी वकिलात सुरू करून ‘मैत्री’साठी सरसावलेल्या चीनबद्दल सामान्य भुतानी माणसांबरोबरच राजकीय निरीक्षकांमध्येही संशयाची भावना आहे़ डोंगराळ भागातील रस्ते बांधणीच्या तंत्रज्ञानापासून भुतानी तरुणांच्या मारुती अल्टो गाडीपर्यंत सारे काही पुरवणाऱ्या शेजारी भारताविषयी मोठ्या भावासारखा आदर! शांतताप्रिय भुतानला आपल्या व्यवस्थेची नवी घडी बसवण्यासाठी भारतासारख्या प्रबळ, सशक्त लोकशाहीचा मोठा आधार वाटतो. पुढल्या पिढीच्या कौशल्य-विकसनासाठीचे भुतानचे नियोजनही सध्या भारताच्या आधारानेच सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची भेट सामान्य नागरिकांनाही महत्त्वाची वाटते आहे, ती म्हणूनच! (वृत्तसंस्था)