शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

चिमुकल्या भुतानची भारतावर मदार

By admin | Updated: June 15, 2014 02:52 IST

दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत

थिम्पू : दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला विस्तारवादी बलाढ्य चीनच्या आगळिकींना तोंड देणे भाग असलेल्या भुतानसाठी तर दुसरा शेजारी असलेल्या भारताबरोबरचे नाते संवेदनशील आहे. भारतातल्या राजकीय आणि सामाजिक बदलांचे पडसाद या देशातील समाजजीवनावर फार तातडीने पडतात. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी भुतानला दिलेला अग्रक्रम या देशासाठी मोठा दिलासाच ठरला आहे. थिम्पू, पुनाखा या भागात फिरताना भेटणारे वाहनचालक, गाइड्स, दुकानदार अशी सारीच सर्वसामान्य माणसे भारताबद्दल फार प्रेमाने आणि औत्सुक्याने बोलतात.एरव्ही पश्चिमेकडे नजर लावून असलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला आशियाई स्वाभिमानाची ताकद देणारे पहिले पाऊल नरेंद्र मोदी यांनी थेट शपथविधीच्या दिवशीच उचलले होते. रुढ राजनैतिक संकेत बाजूला ठेवून शपथविधीनंतरच्या शाही खान्याप्रसंगी मोदींनी भुतानचे पंतप्रधान ल्योंंचेन टोग्बे यांना शेजारी सन्मानाने बसवून घेतले होते, याचे दाखले भुतानमधली वर्तमानपत्रे आजही देताना दिसतात. दक्षिण आशियाई राष्ट्र समूहाच्या नेतृत्वाच्या चाव्या हाती ठेवून जागतिक राजकारण-अर्थकारणात भारताचे वर्चस्व सिद्ध करणे, हा नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा पाया असेल, त्यांची भुतान भेट हे त्याचे निदर्शक असल्याचे मत येथील वर्तमानपत्रात व्यक्त होताना दिसते. घनदाट जंगले आणि उत्तुंग हिमालयाच्या बेचक्यातल्या चिमुकल्या भुतानच्या उर्वरित सीमा दोन बलाढ्य शेजाऱ्यांनी घेरून टाकलेल्या आहेत. उत्तरेला चीन आणि दक्षिणेकडे भारत! थिम्पूमध्ये अलीकडेच प्रचंड मोठी वकिलात सुरू करून ‘मैत्री’साठी सरसावलेल्या चीनबद्दल सामान्य भुतानी माणसांबरोबरच राजकीय निरीक्षकांमध्येही संशयाची भावना आहे़ डोंगराळ भागातील रस्ते बांधणीच्या तंत्रज्ञानापासून भुतानी तरुणांच्या मारुती अल्टो गाडीपर्यंत सारे काही पुरवणाऱ्या शेजारी भारताविषयी मोठ्या भावासारखा आदर! शांतताप्रिय भुतानला आपल्या व्यवस्थेची नवी घडी बसवण्यासाठी भारतासारख्या प्रबळ, सशक्त लोकशाहीचा मोठा आधार वाटतो. पुढल्या पिढीच्या कौशल्य-विकसनासाठीचे भुतानचे नियोजनही सध्या भारताच्या आधारानेच सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची भेट सामान्य नागरिकांनाही महत्त्वाची वाटते आहे, ती म्हणूनच! (वृत्तसंस्था)