शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या भुतानची भारतावर मदार

By admin | Updated: June 15, 2014 02:52 IST

दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत

थिम्पू : दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला विस्तारवादी बलाढ्य चीनच्या आगळिकींना तोंड देणे भाग असलेल्या भुतानसाठी तर दुसरा शेजारी असलेल्या भारताबरोबरचे नाते संवेदनशील आहे. भारतातल्या राजकीय आणि सामाजिक बदलांचे पडसाद या देशातील समाजजीवनावर फार तातडीने पडतात. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी भुतानला दिलेला अग्रक्रम या देशासाठी मोठा दिलासाच ठरला आहे. थिम्पू, पुनाखा या भागात फिरताना भेटणारे वाहनचालक, गाइड्स, दुकानदार अशी सारीच सर्वसामान्य माणसे भारताबद्दल फार प्रेमाने आणि औत्सुक्याने बोलतात.एरव्ही पश्चिमेकडे नजर लावून असलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला आशियाई स्वाभिमानाची ताकद देणारे पहिले पाऊल नरेंद्र मोदी यांनी थेट शपथविधीच्या दिवशीच उचलले होते. रुढ राजनैतिक संकेत बाजूला ठेवून शपथविधीनंतरच्या शाही खान्याप्रसंगी मोदींनी भुतानचे पंतप्रधान ल्योंंचेन टोग्बे यांना शेजारी सन्मानाने बसवून घेतले होते, याचे दाखले भुतानमधली वर्तमानपत्रे आजही देताना दिसतात. दक्षिण आशियाई राष्ट्र समूहाच्या नेतृत्वाच्या चाव्या हाती ठेवून जागतिक राजकारण-अर्थकारणात भारताचे वर्चस्व सिद्ध करणे, हा नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा पाया असेल, त्यांची भुतान भेट हे त्याचे निदर्शक असल्याचे मत येथील वर्तमानपत्रात व्यक्त होताना दिसते. घनदाट जंगले आणि उत्तुंग हिमालयाच्या बेचक्यातल्या चिमुकल्या भुतानच्या उर्वरित सीमा दोन बलाढ्य शेजाऱ्यांनी घेरून टाकलेल्या आहेत. उत्तरेला चीन आणि दक्षिणेकडे भारत! थिम्पूमध्ये अलीकडेच प्रचंड मोठी वकिलात सुरू करून ‘मैत्री’साठी सरसावलेल्या चीनबद्दल सामान्य भुतानी माणसांबरोबरच राजकीय निरीक्षकांमध्येही संशयाची भावना आहे़ डोंगराळ भागातील रस्ते बांधणीच्या तंत्रज्ञानापासून भुतानी तरुणांच्या मारुती अल्टो गाडीपर्यंत सारे काही पुरवणाऱ्या शेजारी भारताविषयी मोठ्या भावासारखा आदर! शांतताप्रिय भुतानला आपल्या व्यवस्थेची नवी घडी बसवण्यासाठी भारतासारख्या प्रबळ, सशक्त लोकशाहीचा मोठा आधार वाटतो. पुढल्या पिढीच्या कौशल्य-विकसनासाठीचे भुतानचे नियोजनही सध्या भारताच्या आधारानेच सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची भेट सामान्य नागरिकांनाही महत्त्वाची वाटते आहे, ती म्हणूनच! (वृत्तसंस्था)