शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाने ४१ राजनयिकांना परत बोलावले, निज्जर वादानंतर भारताने देश सोडण्याचे दिले होते आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 07:46 IST

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची काही महिन्यापूर्वी हत्या झाली, या हत्येच भारताचा सहभाग असल्याचा आरोप खलिस्तानचे पीएम ट्रुडो यांनी केला होता.

गेल्या काही दिवसापूर्वी कॅनडाचे पीएम ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येचा आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशात तणाव वाढला होता, आता कॅनडाने भारतात उपस्थित असलेल्या आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरुवारी १९ ऑक्टोबर मुत्सद्दींना बोलावल्याची माहिती दिली. कॅनडा बदला घेणार नाही असेही ते म्हणाले.

गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रत्युत्तराची कारवाई म्हणजे भारतीय मुत्सद्यांना देश सोडण्याचे आदेश देणे. परराष्ट्र मंत्री जोली यांनी सांगितले की, भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास त्यांचा राजनैतिक दर्जा रद्द करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. भारताचे हे पाऊल अयोग्य असून राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 'भारताच्या कारवाईमुळे आमच्या राजनयिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही त्यांना भारतातून परत बोलावले आहे.' 'जर आपण राजनैतिक प्रतिकारशक्तीसाठी बनवलेले नियम मोडू दिले तर जगातील एकही मुत्सद्दी सुरक्षित राहणार नाही. या कारणास्तव, आम्ही भारताच्या कारवाईला कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. भारत सोडून गेलेल्या ४१ मुत्सद्दी लोकांसोबतच त्यांच्या कुटुंबातील ४२ लोकही आहेत.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सरे शहरातील गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी कॅनडाच्या सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. या हत्येत भारताचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो संसदेत आले आणि भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला. तसेच, ओटावा येथे उपस्थित असलेल्या भारताच्या सर्वोच्च मुत्सद्द्याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.

भारताने ट्रुडो यांचा दावा फेटाळून लावला आणि त्याला राजकीय हेतूने प्रेरित म्हटले. यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या राजनैतिकाला देश सोडण्याचे आदेश दिले. येथूनच भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडायला सुरुवात झाली. यानंतर, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारताने नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या ४१ कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले असल्याची बातमी आली. कॅनडाचे भारतात एकूण ६२ राजनयिक आहेत.

टॅग्स :Canadaकॅनडा