शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"जर तुम्ही दहशतवाद पसरवला तर..."; इस्लामाबादमधून एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:52 IST

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर गेले आहेत. पाकिस्तानामध्ये शांघाय संघटनेची बैठक होणार आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी इस्लामाबादला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. या बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दहशतवाद असाच सुरू राहिला तर व्यवसायाला प्रोत्साहन देता येणार नाही. या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. जेव्हा दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात तेव्हाच परस्पर सहकार्य होऊ शकते. भागीदारी खरी असेल तेव्हाच सहकार्य शक्य आहे. एकतर्फी अजेंडांवरून संबंध प्रगती करू शकत नाहीत. एससीओच्या सनदेनुसार वागले तरच विकास साधता येईल,असा सल्लाही पाकिस्तानला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला.

एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...

"सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरतावादाचा वापर केला तर व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, जग कठीण परिस्थितीत आहे तेव्हा आम्ही भेटत आहोत. जगात दोन मोठे संघर्ष चालू आहेत, याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, असंही ते म्हणाले. एस. जयशंकर काल शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गेले आहेत. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावले आहे.

एस. जयशंकर म्हणाले की, विकास आणि प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे यात शंका नाही. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर विकासाची चर्चा होऊ शकत नाही, सर्वांनी मिळून कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले तर नवीन क्षमता विकसित होतील. यामुळे जगाच्या ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होईल. यामुळे जगात मोठ्या बदलांचा पाया रचला जाईल.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत