शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविली; 'ऑपरेशन  अलर्ट'ला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:47 IST

नुकताच पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सीमेवर दौरा केला होता. हा भाग भारतासाठी खूप महत्वाचा आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये ४,०९६ किमी एवढी लांब सीमा आहे. या सीमेवर घुसखोरी केली जाते. पाकिस्तानसारखीच ही सीमा देखील कुंपण घालून सुरक्षित केली जाणार आहे. यासाठी ऑपरेशन  अलर्ट सुरु करण्यात आले आहे. 

बांगलादेशसोबतची बदलती परिस्थिती पाहून सीमा सुरक्षा दलाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व फील्ड फॉर्मेशनमध्ये 'ऑप्स अलर्ट' सुरू करण्यात आला आहे, असे बीएसएफने म्हटले आहे. 

अतिरिक्त महासंचालक (एडीजी) रवी गांधी यांनी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण बंगाल फ्रंटियरचा दौरा केला आहे. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी सीमा गस्त आणि इतर देखरेख वाढविली जाईल. बीएसएफचे जवान सीमेवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून घुसखोरी किंवा दहशतवादी कायवाया रोखल्या जातील. 

नुकताच पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सीमेवर दौरा केला होता. हा भाग भारतासाठी खूप महत्वाचा आहे. भारताचा चिकन नेक भाग हा उर्वरित सेव्हन सिस्टर राज्यांना देशाशी जोडतो. या भागात पाकिस्तानी अधिकाऱ्यांना घेऊन बांगलादेशी अधिकारी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यांवर चीनचा डोळा आहे. यामुळे हे तीन देश मिळून भारताविरोधात कारस्थाने रचण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नुकताच प्रसिद्ध सिलिगुडी कॉरिडॉरला लागून असलेल्या रंगपूरचा दौरा केला आहे. याच पाकिस्तानी सैन्याने काही दशकांपूर्वी बांगलादेशी नागरिक, महिलांवर अत्याचार केले होते. त्याच पाकिस्तानला हा भारतद्वेष्टा बनलेला बांगलादेश भारताविरोधात कारवाया करण्यासाठी मदत करू लागला आहे. भारताचा हा अत्यंत निमुळता भाग असून पलीकडच्या बाजुला नेपाळ, भूतान आणि या बाजुला बांगलादेश अशी भौगोलिक रचना आहे. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश