शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 17:21 IST

Bangladesh News: बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मात्र या सत्तांतरानंतरही बांगलादेशमधील आंदोलकांचा आक्रोश शांत झालेला नाही. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांसह आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेख हसिना यांना भारतातून माघारी आणलं पाहिजे, तसेच त्यांच्यावर खटला चालवून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 

बांगलादेशमधील आंदोलक हे शेख हसिना यांच्यावर खटला चालवला पाहिजे अशी मागणी करत आहेत. शेख हसिना यांना भारतात परत आणलं पाहिजे. शेख हसिना यांना बांगलादेशात परत पाठवा, अशी आमचाी भारताच्या पंतप्रधानांकडे मागणी आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले.

आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, आमची लढाई केवळ भ्रष्टाराचाराच्या विरोधात होती. आम्ही आधीही हिंदूंसोबत मिळून मिसळून राहत होतो आणि यापुढेही राहू. बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी हिंदूंच्या संरक्षणाची ग्वाही दिली होती. शेख हसिना यांच्या हुकूमशाहीच्या दीड दशकांच्या कार्यकाळादरम्यान देशातील प्रत्येक संस्था नष्ट करण्यात आली. निवडणुकांमध्येही स्पष्टपणे गडबड झाली, असा दावाही युनूस यांनी केला.  दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात ढाका येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर बांगलादेशमधील आंदोलनादरम्यान, दोन लोकांच्या हत्येप्रकरणी दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय