शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 08:25 IST

सक्कर येथील जाहीर सभेत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अध्यक्षांनी उघडपणे दिली धमकी

इस्लामाबाद : भारताने जर सिंधू नदीचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या संदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने शनिवारी प्रसिद्ध केले.

पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू

यासंदर्भात सिंध प्रांतातील सक्कर येथे एका जाहीर सभेत ते म्हणाले की, सिंधू नदी आमची आहे, ती आमचीच राहील. तिच्यातून एकतर पाकिस्तानचे पाणी किंवा भारतीयांचे रक्त वाहील. भारत प्राचीन संस्कृतीचा वारसदार असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र, पाकिस्तान या संस्कृतीचा खरा रक्षणकर्ता आहे. (वृत्तसंस्था)

प्रांतांच्या संमतीने नवे ६ कालवे बांधणार

सिंधू नदीचे पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सिंधू नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या सहा नवीन कालव्यांच्या संदर्भात एक निर्णय घेतला. हे कालवे सर्व प्रांतांच्या संमतीनेच बांधण्यात येतील, असे पाकिस्तान सरकारने ठरवल्याचे पीपीपी या पक्षाने शुक्रवारी सांगितले.

एकत्र संघर्ष करणार

मोहंजोदारो, लारकानामध्ये ही प्राचीन संस्कृती वसली होती. ते प्रांत पाकिस्तानात आहेत. सिंध प्रांत व सिंधू नदीचा हजारो वर्षांचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडू शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानाचे चारही प्रांतांनी एकत्र येऊन पाण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.

'भारतात लोक जास्त; आम्ही अधिक शूर'

बिलावल भुत्तो-झरदारी यांनी सांगितले की, भारताची लोकसंख्या जास्त असली तरी पाकिस्तानचे लोक त्यांच्याहून शूर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युद्धखोर धोरणे, सिंधू नदीचे पाणी रोखण्याचे प्रयत्न पाकिस्तानची जनता, आंतरराष्ट्रीय समुदाय कदापीही सहन करणार नाही.

सिंधू नदीच्या पाण्याची कोणी लूट करत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्ताननेही निषेध केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान