शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 08:25 IST

सक्कर येथील जाहीर सभेत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अध्यक्षांनी उघडपणे दिली धमकी

इस्लामाबाद : भारताने जर सिंधू नदीचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या संदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने शनिवारी प्रसिद्ध केले.

पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू

यासंदर्भात सिंध प्रांतातील सक्कर येथे एका जाहीर सभेत ते म्हणाले की, सिंधू नदी आमची आहे, ती आमचीच राहील. तिच्यातून एकतर पाकिस्तानचे पाणी किंवा भारतीयांचे रक्त वाहील. भारत प्राचीन संस्कृतीचा वारसदार असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र, पाकिस्तान या संस्कृतीचा खरा रक्षणकर्ता आहे. (वृत्तसंस्था)

प्रांतांच्या संमतीने नवे ६ कालवे बांधणार

सिंधू नदीचे पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सिंधू नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या सहा नवीन कालव्यांच्या संदर्भात एक निर्णय घेतला. हे कालवे सर्व प्रांतांच्या संमतीनेच बांधण्यात येतील, असे पाकिस्तान सरकारने ठरवल्याचे पीपीपी या पक्षाने शुक्रवारी सांगितले.

एकत्र संघर्ष करणार

मोहंजोदारो, लारकानामध्ये ही प्राचीन संस्कृती वसली होती. ते प्रांत पाकिस्तानात आहेत. सिंध प्रांत व सिंधू नदीचा हजारो वर्षांचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडू शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानाचे चारही प्रांतांनी एकत्र येऊन पाण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.

'भारतात लोक जास्त; आम्ही अधिक शूर'

बिलावल भुत्तो-झरदारी यांनी सांगितले की, भारताची लोकसंख्या जास्त असली तरी पाकिस्तानचे लोक त्यांच्याहून शूर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युद्धखोर धोरणे, सिंधू नदीचे पाणी रोखण्याचे प्रयत्न पाकिस्तानची जनता, आंतरराष्ट्रीय समुदाय कदापीही सहन करणार नाही.

सिंधू नदीच्या पाण्याची कोणी लूट करत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्ताननेही निषेध केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान