शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पाकिस्तानातील विरोध संपणार; इम्रान खान यांच्या PTI पक्षावर बंदी घालण्याची तयारी, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:53 IST

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

PTI Banned in Pakistan : तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर दंगल भडकवणे, लाच घेणे आणि देशाच्या प्रमुखपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा आरोप आहे. पाकिस्तानातील मंत्री अताउल्लाह तरार यांनी याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या पक्षाला निवडणूक लढवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि सर्वाधिक जागा जिंकल्या. पण, इतर पक्ष एकत्र आल्यामुळे इम्रान खान यांना सरकार स्थापन करता आले नाही. आता तर थेट त्यांच्या पक्षावरच बंदी घालण्याची तयारी सरकारने केली आहे.

पीटीआयवर बंदीचे सबळ पुरावेपाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तान सरकारने देशविरोधी कारवायांमुळे इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या विरोधात कलम 6 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पीटीआयच्या विरोधात विदेशी फंडिंग, 9 मे रोजी झालेली दंगल, सायफर प्रकरण आणि अमेरिकेत मंजूर केलेला ठराव, याबाबत सबळ पुरावे आहेत, असेही ते म्हणाले. 

क्रिकेटर ते देशाचे पंतप्रधान, असा प्रवास...पाकिस्तानला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इम्रान खान यांनी 1996 मध्ये पीटीआयची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेच्या 22 वर्षांनंतर, म्हणजेच 2018 मध्ये पक्ष सत्तेवर आले, पण 2022 मध्ये विश्वासदर्शक ठरावात पराभूत होऊन सत्ता सोडावी लागली. यानंतर झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि आसिफ अली झरदारी यांच्या पीपीपीने सोबत येऊन देशात सरकार स्थापन केले. इम्रान खान यांना एप्रिलमध्ये सत्तेतून बेदखल केल्यानंतर अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशात खुप गोंधळ घातला. पाकिस्तानी लष्कराच्या अनेक आस्थापनांवरही हल्ले झाले. त्या घटनेलाच देशविरोधी कृत्य मानण्यात आले आहे. त्यामुळेच सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असून पीटीआयवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानInternationalआंतरराष्ट्रीयNawaz Sharifनवाज शरीफ