शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

...तर परिस्थिती आणखी बिघडेल, संकट वाढेल! सात बडे देश भारतावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 18:11 IST

मोदी सरकारच्या निर्णयामुळे ७ बड्या देशांचा संताप; भारतावर टीकास्त्र

नवी दिल्ली: घटलेलं उत्पादन आणि त्यामुळे वाढलेल्या किमती याचा विचार करून मोदी सरकारनं गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय काल घेतला. भारताच्या या निर्णयाबद्दल बड्या देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी-७ देशाच्या कृषिमंत्र्यांनी भारत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. जी-७ मध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारावरील दबाव वाढू नये म्हणून जगभरातील देशांनी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याचं आवाहन जी-७ देशांनी केलं होतं. मात्र भारतानं गव्हाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जर्मनीचे कृषिमंत्री केम ओजडेमिर यांनी एका पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. प्रत्येकानं निर्यात रोखण्याचा निर्णय घेतल्यास संकट आणखी वाढेल आणि परिस्थिती बिघडेल, असं ओजडेमिर म्हणाले. भारत जी-२० चा सदस्य आहे. या गटाचा सदस्य म्हणून भारतानं आपली जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन ओजडेमिर यांनी केलं. 

भारतात गव्हाचे दर वाढले आहेत. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारनं गव्हाची निर्यात थांबवण्याचा निर्णय काल घेतला. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाच्या एकूण जागतिक निर्यातीपैकी २५ टक्के निर्यात रशिया आणि युक्रेन करतात. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या निर्यातीवर झाला आहे. रशिया, युक्रेनकडून पुरेसा गहू मिळत नसल्यानं युरोपसह आफ्रिकन देशांच्या नजरा भारताकडे होत्या. मात्र भारत सरकारनं गहू निर्यात रोखल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.