शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:23 IST

परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

Agartala Consulate breach : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या संदर्भात आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालया जवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तोडफोड केली. या प्रकरणी मंगळवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

भारतीय उच्चायुक्त काय म्हणाले?

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील व्यापक संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले की, ही भेट कोणत्याही एका मुद्द्यापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. आम्हाला दोन्ही देशातील सकारात्मक, स्थिर, विधायक नातेसंबंध पुढे न्यायचे आहेत. आम्ही अनेक बाबींमध्ये एकमेकांवर अवलंबून आहोत आणि आमच्या सहकार्याचा दोन्ही देशांच्या लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. गेल्या काही महिन्यांत दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक विकास झाला आहे. व्यापार असो, वीज पारेषण असो किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो, आम्ही बरीच सकारात्मक गती राखली आहे. आम्ही बांग्लादेशच्या अंतरिम सरकारशी संलग्न कारभार करण्यास तयार आहोत आणि शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत.

सात जणांना अटक, तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबित

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशी मिशनवर झालेल्या कथित हल्ल्याच्या अवघ्या काही तासांनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याचे वर्णन 'अत्यंत खेदजनक' असे केले. कोणत्याही परिस्थितीत, राजकीय आणि वाणिज्य दूतांच्या मालमत्तांना लक्ष्य केले जाऊ नये, असा पुनरुच्चार करण्यात आला. MEA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी कारवाई करत आहे. दरम्यान, आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात कथित तोडफोड आणि बांगलादेशी राष्ट्रध्वज जबरदस्तीने काढून टाकल्याप्रकरणी सोमवारी सात जणांना अटक करण्यात आली, तर सरकारने या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही केले.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश