शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:23 IST

परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

Agartala Consulate breach : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या संदर्भात आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालया जवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तोडफोड केली. या प्रकरणी मंगळवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

भारतीय उच्चायुक्त काय म्हणाले?

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील व्यापक संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले की, ही भेट कोणत्याही एका मुद्द्यापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. आम्हाला दोन्ही देशातील सकारात्मक, स्थिर, विधायक नातेसंबंध पुढे न्यायचे आहेत. आम्ही अनेक बाबींमध्ये एकमेकांवर अवलंबून आहोत आणि आमच्या सहकार्याचा दोन्ही देशांच्या लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. गेल्या काही महिन्यांत दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक विकास झाला आहे. व्यापार असो, वीज पारेषण असो किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो, आम्ही बरीच सकारात्मक गती राखली आहे. आम्ही बांग्लादेशच्या अंतरिम सरकारशी संलग्न कारभार करण्यास तयार आहोत आणि शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत.

सात जणांना अटक, तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबित

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशी मिशनवर झालेल्या कथित हल्ल्याच्या अवघ्या काही तासांनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याचे वर्णन 'अत्यंत खेदजनक' असे केले. कोणत्याही परिस्थितीत, राजकीय आणि वाणिज्य दूतांच्या मालमत्तांना लक्ष्य केले जाऊ नये, असा पुनरुच्चार करण्यात आला. MEA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी कारवाई करत आहे. दरम्यान, आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात कथित तोडफोड आणि बांगलादेशी राष्ट्रध्वज जबरदस्तीने काढून टाकल्याप्रकरणी सोमवारी सात जणांना अटक करण्यात आली, तर सरकारने या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही केले.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश