शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:23 IST

परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

Agartala Consulate breach : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या संदर्भात आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालया जवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तोडफोड केली. या प्रकरणी मंगळवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

भारतीय उच्चायुक्त काय म्हणाले?

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील व्यापक संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले की, ही भेट कोणत्याही एका मुद्द्यापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. आम्हाला दोन्ही देशातील सकारात्मक, स्थिर, विधायक नातेसंबंध पुढे न्यायचे आहेत. आम्ही अनेक बाबींमध्ये एकमेकांवर अवलंबून आहोत आणि आमच्या सहकार्याचा दोन्ही देशांच्या लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. गेल्या काही महिन्यांत दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक विकास झाला आहे. व्यापार असो, वीज पारेषण असो किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो, आम्ही बरीच सकारात्मक गती राखली आहे. आम्ही बांग्लादेशच्या अंतरिम सरकारशी संलग्न कारभार करण्यास तयार आहोत आणि शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत.

सात जणांना अटक, तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबित

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशी मिशनवर झालेल्या कथित हल्ल्याच्या अवघ्या काही तासांनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याचे वर्णन 'अत्यंत खेदजनक' असे केले. कोणत्याही परिस्थितीत, राजकीय आणि वाणिज्य दूतांच्या मालमत्तांना लक्ष्य केले जाऊ नये, असा पुनरुच्चार करण्यात आला. MEA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी कारवाई करत आहे. दरम्यान, आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात कथित तोडफोड आणि बांगलादेशी राष्ट्रध्वज जबरदस्तीने काढून टाकल्याप्रकरणी सोमवारी सात जणांना अटक करण्यात आली, तर सरकारने या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही केले.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश