शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन करणार", बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:06 IST

Bangladesh Protests : बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) देशाला संबोधित केले.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्या भारताकडे येण्यासाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना देश सोडून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या घटनेनंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) देशाला संबोधित केले. लष्करप्रमुख म्हणाले की, देशात ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. शेख हसीना बांगलादेशचे पंतप्रधानपद सोडून भारतातील आगरतळा शहरात रवाना झाल्या आहेत.

दरम्यान, बांगलादेशी विद्यार्थी गेल्या महिन्यापासून शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करत होते. हे आंदोलन खूपच हिंसक झाले होते. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले आणि तोडफोड केली. 

काय म्हणाले लष्करप्रमुख?लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान म्हणाले की, पंतप्रधान हसीना यांनी राजीनामा दिला आहे, अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतो. गेल्या काही आठवड्यात झालेल्या सर्व हत्यांचा तपास करू. तसेच, लष्कराने सर्व जबाबदारी घेतली आहे. सर्व हत्येचा खटला चालणार आहे. आपण सर्वांनी संघर्ष न करता शांततेच्या मार्गावर परत येऊ या. मी सर्व जबाबदारी घेतो, असेही लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्वसमावेशक सरकारबाबत राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे. त्यापैकी बीएनपी, जमात इस्लाम अमीर, मामुनुल हक, डॉ. आसिफ नजरुल चर्चेत होते. मात्र, अवामी लीगचे कोणीही नव्हते, असे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान म्हणाले. दरम्यान, आंदोलक करणाऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी केले आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय