शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून पळाल्या, 'अशा' परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:05 IST

देशभरात सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina : बांग्लादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आरक्षणविरोधीआंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलकांनी आज पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून खूप नासधूस केली. अशातच, देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आज(दि.5) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून भारतामध्ये आश्रय घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत. शेख हसिना आणि त्यांची बहीण रेहाना लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बांग्लादेशच्या स्थानिक मीडियानुसार, शेख हसीना भारताच्या दिशेन रवाना झाल्या आहेत. दरम्यान, बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आता लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांच्याकडे देशाची जबाबदारी आली आहे. त्यांनी लवकरच देशात अंतरिम सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. 

हसीना यांना देश सोडण्यापूर्वी भाषण रेकॉर्ड करायचे होते, पण...बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी त्यांचे निरोपाचे भाषण रेकॉर्ड करायचे होते. मात्र, अचानक परिस्थिती बिघडली, ज्यामुळे त्यांना आपले भाषण अर्ध्यावर सोडून देश सोडून पळून जावे लागले. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, देशाच्या लष्कराने हसीना यांना देश सोडण्यासाठी 45 मिनिटांची नोटीस दिली होती.

लष्करप्रमुख काय म्हणाले?दरम्यान, शेख हसिना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी देशाला संबोधित केले आहे. आपल्या भाषणात हिंसाचार थांबवण्याचे आवाहन करताना त्यांनी हिंसाचारात मारल्या गेलेल्यांना न्याय दिला जाईल असे सांगितले. तसेच, देशातील कर्फ्यू हटवण्याची घोषणा करताना सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले.

भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारीबांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. याबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत. बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा 4096 किलोमीटर लांब आहे. बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षणagitationआंदोलनInternationalआंतरराष्ट्रीय