शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 08:47 IST

प्रस्तावात आणखी काय...? काय परिणाम होणार...?

सध्या बांगलादेशात बऱ्याच घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता तेथे संविधान सुधारणा आयोगाने बुधवारी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांच्याकडे आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाची तीन मूलभूत तत्त्वे अर्थात 'धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद' ही काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे बांगलादेश आणि भारतातही चिंता वाढली आहे. कारण हे सिद्धांत १९७१ च्या मुक्ती युद्धाच्या मूलभूत आदर्शांचा एक भाग आहेत.

बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर तेथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर तेथे आलेल्या नव्या प्रशासनाने संविधान सुधारणा आयोगाची स्थापना केली. या आयोगाने समता, मानव सन्मान, सामाजिक न्याय, बहुलवाद आणि लोकशाही हे 5 नवे राज्य सिद्धांत प्रस्तावित केले आहेत. यात गेल्या सिद्धांतांपैकी केवळ 'लोकशाही' हाच सिद्धांत कायम ठेवण्यात आला आहे.

दोन सभागृहांच्या संसदेचा प्रस्ताव -संविधान सुधारणा आयोगाने देशात दोन सभागृहाच्या संसदेची शिफारस करण्यात आली आहे. यात नॅशनल असेंबली आणि सीनेट, अशी दोन सभागृहे असतील. तसेच, खालच्या सभागृहात 400 तर वरच्या सभागृहात 105 जागा असतील. याशिवाय दोन्ही सभागृहांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 4 वर्ष करण्यात यावा, अशी शिफारसही आयोगाकडून करण्या आली आहे.

धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवल्यास काय परिणाम होईल?धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवण्याच्या प्रस्तावावरून सध्या बांगलादेशात जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे सिद्धांत बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सामाजिक संरचनेचे आधारभूत स्तंभ मानले जातात. हे शब्द वगळल्यास देशाच्या धर्मनिरपेक्ष संरचनेवर आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत मोठा परिणाम  होऊ शकतो. खरे तर या प्रस्तावामुळे मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला आहे आणि खरा रंग समोर आला आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश