शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Sri Lanka crisis: श्रीलंकेत आता साेशल मीडियावर बंदी, निदर्शने राेखण्यासाठी उचलले पाऊल, शेकडाे आंदाेलकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:02 IST

Sri Lanka crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली आहे.

काेलंबाे : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली आहे.

श्रीलंका सरकारने शनिवारी आणीबाणी घाेषित केल्यानंतर ३६ तासांसाठी संचारबंदी लागू केली हाेती. आता तेथे व्हाॅट्सॲप, ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या साेशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. देशात वीजटंचाई, अन्नधान्य, इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याची जाेरदार टीका हाेत आहे. सरकारविराेधात जनताही रस्त्यावर उतरू लागली आहे. त्यांना एकत्र येण्यापासून राेखण्यासाठी साेशल मीडियावर बंदी टाकण्यात आल्याची टीका हाेत आहे.

सायबर सुरक्षा आणि इंटरनेटवर लक्ष्य ठेवणारी ‘नेटब्लाॅक्स’ या संघटनेने साेशल मीडिया अनेक ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याचा दुजाेरा दिला. श्रीलंकेतील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स श्रीलंका टेलीकाॅ, माेबिटेल, हच या कंपन्या बंदीच्या कक्षेत आल्या आहेत. फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम, टाॅकटाॅक, स्नॅपचॅट, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, इत्यादींवर बंदीचा परिणाम झाला आहे.

बंदीचा उपयाेग नाही- नमल राजपक्षेश्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांचा पुतण्या आणि मंत्री असलेल्या नमल राजपक्षे यांनी सरकारला साेशल मीडियावरील बंदीवरून घरचा आहेर दिला आहे. या बंदीचा काही उपयाेग नसून नागरिकांकडे व्हीपीएनसारखे इतर पर्याय उपलब्ध  असल्याचे त्यांनी सांगितले. 

६०० आंदाेलकांना केली अटकसरकारच्या विराेधात रॅली काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६०० हून अधिक नागरिकांना पश्चिमेकडील भागातून अटक करण्यात आली. विराेधी पक्षनेते सजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली हाेती. 

विराेधांची निदर्शनेआणीबाणी व संचारबंदीचे आदेश झुगारून श्रीलंकेतील प्रमुख विराेधी पक्ष समागी जन बलवेगयाच्या खासदारांनी काेलंबाेमध्ये जाेरदार निदर्शने केली. यावेळी राष्ट्रपती गाेटाबाया राजपक्षे यांनी घेतलेल्या निर्णयाचा विराेध करण्यात आला. श्रीलंकेत लाेकशाहीचे आम्ही रक्षण करू, असे विराेधी पक्षाचे खासदार हर्षा डिसिल्व्हा म्हणाले.

एअर इंडियाकडून उड्डाणांमध्ये कपातएअर इंडियाने श्रीलंकेमध्ये दर आठवड्यात जाणाऱ्या उड्डाणांची संख्या १६ वरून १३ पर्यंत आणली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. दिल्लीहून जाणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInflationमहागाई