शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Moon Soil Plant: अफलातून प्रयोग! चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवले रोपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:45 IST

अमेरिकी शास्त्रज्ञांची ऐतिहासिक कामगिरी

वॉशिंग्टन : माणसासह प्राणिमात्रांना भूतलावर जगण्यासाठी पाणी आणि प्राणवायू यांची गरज असते. पृथ्वीप्रमाणेच ब्रह्मांडातही असे वातावरण असेल किंवा कसे, याचा शोध घेण्याचा मानवाचा प्रयत्न अव्याहत सुरू आहे. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर त्यासाठी अनेक मोहिमाही राबविण्यात आल्या. यातील एका मोहिमेत चंद्रावरून माती आणण्यात आली. या मातीत आता रोपटे उगविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

काही वर्षांपूर्वी 'नासा'च्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्रावरुन ही माती आणली होती. चंद्रावरुन आणलेल्या मातीत पहिल्यांदाच रोपटं उगवण्यात त्यांना यश आले आहे. नासाच्या अपोलो मोहिमेतील सहा अंतराळवीर चंद्रावरून ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन आले होते. हे दगड शास्त्रज्ञांना वाटण्यात आले. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नासाकडून १२ ग्रॅम माती मिळाली. इतक्या कमी मातीत काम करणे खूप अवघड होते, पण अखेरीस यश मिळाले.  (वृत्तसंस्था)

असा केला प्रयोग...n चंद्रावरच्या मातीला रेगोलिथ असे म्हटले जाते. मातीचे चार वेगवेगळ्या भागात विभाजन करून त्यात पाणी आणि पोषक घटक असलेले द्रव्य शास्त्रज्ञांनी मिसळले.n यानंतर त्यात अर्बिडोप्सिसच्या बिया टाकल्यानंतर काही दिवसांतच कुंडीत लहान रोपटे उगवले. n रोपाविषयीची सविस्तर माहिती ‘जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.  

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स