शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:20 IST

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.

कोलंबो  - ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.भारताने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे की, श्रीलंकेला गोपनीय माहिती पुरविली होती. एका महिलेसह ९ आत्मघाती हल्लेखोरांनी २१ एप्रिल रोजी तीन चर्च आणि तीन आलिशान हॉटेलमध्ये हल्ले घडवून आणले. यात २५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले.इसिसने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे; पण सरकार स्थानिक संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ला जबाबदार ठरवीत आहे. श्रीलंकेने या संघटनेवर बंदी आणली आहे, तर १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. यात एखाद्या विदेशी संघटनेचा हात आहे काय? असे विचारले असता कमांडरनी सांगितले की, ज्या प्रकारे हे स्फोट घडवून आणले त्यावरून बाहेरील शक्तींचा यात हात असावा असे वाटते. (वृत्तसंस्था)काय म्हणाले सैन्यप्रमुख?सैन्याचे कमांडर ले. जनरल महेश सेनानायक यांनी सांगितले की, ते संशयित भारतात गेले होते. काश्मीर, बंगळुरू, केरळात गेले होते. आम्हाला याची माहिती मिळाली आहे. काश्मीर, केरळात हे संशयित काय करीत होते? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, प्रशिक्षण आणि देशाबाहेरील अन्य संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी ते गेले होते.

टॅग्स :sri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटIndiaभारत