शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 09:40 IST

यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे चीन जबरदस्त संतापला आहे. जर पाकिस्तान चिनी नागरिकांचे संरक्षण करण्यात असमर्थ असेल तर आम्ही स्वतः करू, अशा शब्दात चीननेपाकिस्तानला सुनावले आहे. यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. यानंतर आता, आपले सरकार पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करेल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी म्हटले आहे.

चीन नाराज - खैबर पख्तुनख्वामधील बेशम भागात 26 मार्च रोजी आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या सहाय्याने चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात पाच चिनी अभियंते आणि त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला. सर्व चिनी नागरिक दासू जलविद्युत प्रकल्पात काम करत होते. चिनी नागरिकांचा एक चमू इस्लामाबादहून दासूकडे जात असताना हा हल्ला झाला. या घटनेच्या चौकशीसाठी पाकिस्तानने एक समितीही स्थापन केली होती. मात्र, त्यावर चीनला विश्वास नव्हता. यामुळे चीनने स्वतःचे एक तपास पथक पाठवले. या पथकाने, पाकिस्तानकडून सुरक्षिततेसंदर्भात राहिलेल्या त्रुटींमुळे दहशतवाद्यांना हा हल्ला करण्याची संधी मिळाली, असा दावा केला आहे.

शाहबाज शरीफ दासूत -चीनकडून वारंवार होणाऱ्या अपमानानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सोमवारी दासूत पोहोचले आणि तेथील चिनी कामगारांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी नागरिकांसोबत संवाद साधताना शरीफ म्हणाले, 26 मार्चच्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाही, याची काळजी पाकिस्तान सरकार घेईल. एवढेच नाही, तर हा दहशतवादी हल्ला म्हणजे, पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनTerrorismदहशतवादXi Jinpingशी जिनपिंग