शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

दहशतवाद नामंजूर, ओलीस ठेवलेल्या बंधकांची सुटका झालीच पाहिजे; भारताने ठणकावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 20:02 IST

मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज असल्याचेही बागची यांचे मत

Arindam Bagchi India, Israel Hamas Palestine Conflict: गेल्या काही महिन्यांपासून गाझा पट्ट्यात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा पॅलेस्टाईनला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे भारताने पॅलेस्टाइन मधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, या भागातील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे तातडीची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, अरिंदम बागची म्हणाले. सध्या सुरू असलेला संघर्ष या प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या अहवालानंतर परस्पर संवादातील मानवाधिकार परिषदेच्या 55 व्या सत्रादरम्यान एका निवेदनात बागची यांनी हे सांगितले.

बागची यांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याच्या सार्वत्रिक बंधनाबाबत स्पष्ट असण्याची गरजही व्यक्त केली. बागची म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील सध्याची परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि मुलांचे नुकसान होत आहे. मानवतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंतेची आहे. हे स्पष्टपणे अस्वीकाहार्य आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध करतो.

दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे कायमच अयोग्य!

मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज आहे. हा संघर्ष प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दोन-राज्य तत्त्वावर आधारित इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढणे पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे झाले आहे यावर भारताने भर दिला. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. भारत आपल्या बाजूने द्विपक्षीय विकास भागीदारीद्वारे पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत राहील आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारत