शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
4
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
5
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
6
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
7
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
8
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
9
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
10
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
11
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
12
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
13
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
14
IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?
15
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
16
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ
17
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
18
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
19
जगातील 'या' देशांत १ लाख रुपये कमवाल तर भारतात येऊन मालमाल व्हाल! तुम्हाला माहीत आहे का?
20
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स

भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:38 IST

India Bangladesh Relationship: बांगलादेशातील हंगामी सरकारला सध्या कोणतीही जोखीम पत्करायची नसल्याचे दिसतेय

India Bangladesh Relationship: बांगलादेशात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मुहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार बांगलादेशात कार्यरत आहे. या सरकारची भूमिका काही वेळा भारतविरोधी असल्याचे दिसून आले आहे. पण आता मात्र भारतासाठी बांगलादेशातून एक चांगली बातमी मिळत आहे. भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणाऱ्या दोन बांगलादेशी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी दोन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

भारतविरोधी २ मंत्र्यांची हकालपट्टी

बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये अस्थिरतेचे सावट आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने त्यांना पॅकेजमधील मोठी रक्कम देण्यास नकार दिला आहे. बांगलादेशात निवडणुकीच्या माध्यमातून स्थिर सरकार स्थापन झाल्यावरच त्यांना पॅकेजचा पुढचा हप्ता मिळणार आहे. तशातच आता बांगलादेशने भारतविरोधी मंत्र्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत त्यांची नावे महफुज आलम आणि आसिफ महमूद आहेत.

महफूज आणि आसिफ कोण आहेत?

बांगलादेशात सध्या हंगाम सरकार असल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सल्लागार म्हटले जाते. महफुज आलम हे युनूस यांचे निकटवर्तीय मानले जातात. विद्यार्थी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते असा त्यांचा उल्लेख केला जातो. महफुज यांना ऑगस्ट २०२४ मध्ये युनूस यांचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. महफुज यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे. महफुज आलम भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकताना दिसतात. महफुज हे आता नाहिद इस्लामच्या पक्षात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे.

आसिफ महमूद यांच्याकडे मंत्रिमंडळात युवा आणि क्रीडा मंत्रालय आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी झालेल्या विद्यार्थी चळवळीत आसिफ यांचा मोठा वाटा होता. आसिफने अधूनमधून भारतावर टीका केली आहे. अलिकडेच आसिफने दावा केला होता की बांगलादेश सरकारने भारतासोबतचे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. त्यानंतर युनूस सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांना आसिफचा दावा फेटाळण्यासाठी पुढे यावे लागले होते.

निवडणुकीपूर्वी दोघांवरही कारवाई

बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी जे मंत्री तटस्थ नाहीत त्यांना बाहेर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आसिफ आणि महफुज हे भारतासोबतच स्थानिक पक्षांविरुद्धही आवाज उठवत आहेत. युनूस यांचे अंतरिम सरकार निवडणुकीदरम्यान बदनाम होऊ इच्छित नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशministerमंत्रीIndiaभारत