शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:38 IST

India Bangladesh Relationship: बांगलादेशातील हंगामी सरकारला सध्या कोणतीही जोखीम पत्करायची नसल्याचे दिसतेय

India Bangladesh Relationship: बांगलादेशात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मुहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार बांगलादेशात कार्यरत आहे. या सरकारची भूमिका काही वेळा भारतविरोधी असल्याचे दिसून आले आहे. पण आता मात्र भारतासाठी बांगलादेशातून एक चांगली बातमी मिळत आहे. भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणाऱ्या दोन बांगलादेशी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी दोन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

भारतविरोधी २ मंत्र्यांची हकालपट्टी

बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये अस्थिरतेचे सावट आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने त्यांना पॅकेजमधील मोठी रक्कम देण्यास नकार दिला आहे. बांगलादेशात निवडणुकीच्या माध्यमातून स्थिर सरकार स्थापन झाल्यावरच त्यांना पॅकेजचा पुढचा हप्ता मिळणार आहे. तशातच आता बांगलादेशने भारतविरोधी मंत्र्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत त्यांची नावे महफुज आलम आणि आसिफ महमूद आहेत.

महफूज आणि आसिफ कोण आहेत?

बांगलादेशात सध्या हंगाम सरकार असल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सल्लागार म्हटले जाते. महफुज आलम हे युनूस यांचे निकटवर्तीय मानले जातात. विद्यार्थी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते असा त्यांचा उल्लेख केला जातो. महफुज यांना ऑगस्ट २०२४ मध्ये युनूस यांचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. महफुज यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे. महफुज आलम भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकताना दिसतात. महफुज हे आता नाहिद इस्लामच्या पक्षात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे.

आसिफ महमूद यांच्याकडे मंत्रिमंडळात युवा आणि क्रीडा मंत्रालय आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी झालेल्या विद्यार्थी चळवळीत आसिफ यांचा मोठा वाटा होता. आसिफने अधूनमधून भारतावर टीका केली आहे. अलिकडेच आसिफने दावा केला होता की बांगलादेश सरकारने भारतासोबतचे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. त्यानंतर युनूस सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांना आसिफचा दावा फेटाळण्यासाठी पुढे यावे लागले होते.

निवडणुकीपूर्वी दोघांवरही कारवाई

बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी जे मंत्री तटस्थ नाहीत त्यांना बाहेर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आसिफ आणि महफुज हे भारतासोबतच स्थानिक पक्षांविरुद्धही आवाज उठवत आहेत. युनूस यांचे अंतरिम सरकार निवडणुकीदरम्यान बदनाम होऊ इच्छित नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशministerमंत्रीIndiaभारत