शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परत येणार! कधी अन् का.. वाचा तिनेच दिलेलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:58 IST

अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे

Anju in Pakistan: भारतीय महिला व राजस्थानची रहिवासी असलेली अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला आल्याचे सांगितले. नसरुल्लाला ती फेसबुकवर भेटली आणि प्रेमात पडल्याचे अंजूने मान्य केले. त्यानंतर तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे.

अंजू भारतात परतणार... का आणि कधी?

अंजू ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. अंजूशी झालेल्या संवादाच्या आधारे ती भारतात येणार असल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुलांसाठी ती भारतात परतत असल्याचे अंजूने म्हटलं आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि भारतात परतल्यानंतर ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे तिने सांगितले. अंजूने सांगितले की तिची पाकिस्तानमधील व्हिसाची मर्यादा संपुष्टात येत आहे आणि ती व्हिसाची कालमर्यादा वाढवू इच्छित नाही. तिची मुलं हे त्यामागचे कारण आहे. तिला भारतात परतायचे आहे आणि मुलांसोबत राहायचे आहे. ती फक्त मुलांसाठी येत आहे, असे तिने सांगितले आहे.अंजू म्हणते की तिने कधीही कोणापासून काहीही लपवलेले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीला फोन केला. आई-वडिलांशीही बोललो. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती म्हणाली की ती देशाच्या सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. अंजू म्हणाली की तिचा हेतू चुकीचा नव्हता. पाकिस्तानात आल्यावर ती पूर्णपणे कायदेशीररित्या आली. अंजू भारतात आल्यानंतर काही मोठे खुलासेदेखील करणार आहे.

काय आहे अंजूची कहाणी?

मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या अंजूचे 2007 मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले. ३४ वर्षीय अंजूला दोन मुले आहेत. यावर्षी अंजू सोशल मीडियावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाच्या प्रेमात पडली आणि व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली. अंजूने परदेशात नोकरीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी पासपोर्ट बनवला होता आणि त्यानंतर या वर्षी ती शांतपणे पाकिस्तानचा व्हिसा मिळवून निघून गेली. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर दोन्ही देशांच्या मीडियामध्ये ती प्रसिद्ध झाली. पाकिस्तानातील अनेक बडे व्यापारीही तिला भेटायला आले असल्याचे सांगितले गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत