शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परत येणार! कधी अन् का.. वाचा तिनेच दिलेलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:58 IST

अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे

Anju in Pakistan: भारतीय महिला व राजस्थानची रहिवासी असलेली अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला आल्याचे सांगितले. नसरुल्लाला ती फेसबुकवर भेटली आणि प्रेमात पडल्याचे अंजूने मान्य केले. त्यानंतर तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे.

अंजू भारतात परतणार... का आणि कधी?

अंजू ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. अंजूशी झालेल्या संवादाच्या आधारे ती भारतात येणार असल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुलांसाठी ती भारतात परतत असल्याचे अंजूने म्हटलं आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि भारतात परतल्यानंतर ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे तिने सांगितले. अंजूने सांगितले की तिची पाकिस्तानमधील व्हिसाची मर्यादा संपुष्टात येत आहे आणि ती व्हिसाची कालमर्यादा वाढवू इच्छित नाही. तिची मुलं हे त्यामागचे कारण आहे. तिला भारतात परतायचे आहे आणि मुलांसोबत राहायचे आहे. ती फक्त मुलांसाठी येत आहे, असे तिने सांगितले आहे.अंजू म्हणते की तिने कधीही कोणापासून काहीही लपवलेले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीला फोन केला. आई-वडिलांशीही बोललो. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती म्हणाली की ती देशाच्या सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. अंजू म्हणाली की तिचा हेतू चुकीचा नव्हता. पाकिस्तानात आल्यावर ती पूर्णपणे कायदेशीररित्या आली. अंजू भारतात आल्यानंतर काही मोठे खुलासेदेखील करणार आहे.

काय आहे अंजूची कहाणी?

मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या अंजूचे 2007 मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले. ३४ वर्षीय अंजूला दोन मुले आहेत. यावर्षी अंजू सोशल मीडियावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाच्या प्रेमात पडली आणि व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली. अंजूने परदेशात नोकरीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी पासपोर्ट बनवला होता आणि त्यानंतर या वर्षी ती शांतपणे पाकिस्तानचा व्हिसा मिळवून निघून गेली. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर दोन्ही देशांच्या मीडियामध्ये ती प्रसिद्ध झाली. पाकिस्तानातील अनेक बडे व्यापारीही तिला भेटायला आले असल्याचे सांगितले गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत