शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:31 IST

अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे.

भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता पुन्हा एकदा भारतात परतायचं आहे. अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे. पण नंतर तिचे असे काही फोटो समोर आले, ज्यावरून तिने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय अंजूने तिचा धर्मही बदलला आहे. पण आता अंजूने ती खूप दुःखी असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसी पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, अंजू म्हणाली, "पाकिस्तानात सर्व काही सकारात्मक आहे. काही वेगळेच नियोजन करून मी येथे आले. पण मी जो काही विचार केला त्याऐवजी भलतंच घडलं. माझ्याकडून काहीना काही चूक झाली आहे. इथे जे काही घडले त्यामुळे माझ्या कुटुंबाचा भारतात अपमान झाला आहे. हे सर्व माझ्यामुळे घडलं आहे, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. दुसरं म्हणजे मुलांच्या मनात माझ्याबद्दल आता नेमकी काय इमेज तयार झाली असेल."

"मला भारतात जायचं आहे"

अंजू पुढे म्हणाली, "मला कोणत्याही मार्गाने भारतात जायचे आहे आणि मी तिथे जाऊ शकते. मला प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा आहे. मला तिथल्या मीडियालाही उत्तर द्यायचं आहे. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, हे मी त्यांना सांगेन. माझी खूप चांगली काळजी घेतली गेली. हा माझा स्वतःचा निर्णय होता. मीडियाच्या दबावामुळे मी लवकर परत जाऊ शकले नाही. मला एकदा जाऊन मुलांना भेटायचं आहे. कारण मी त्यांना दिवसरात्र मिस करत आहे."

पाकिस्तानने अंजूचा व्हिसा वाढवला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण अंजूचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह याने सत्य सांगितलं आहे. वृत्तानुसार, नसरुल्लाहने सांगितलं की, त्यांनी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे. मात्र व्हिसाची मुदत वाढलेली नाही. याशिवाय पोलिसांनी असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे अद्याप असे कोणतेही कागदपत्र नाही, ज्यामुळे अंजूचा व्हिसाची मुदत वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान