शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:31 IST

अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे.

भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता पुन्हा एकदा भारतात परतायचं आहे. अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे. पण नंतर तिचे असे काही फोटो समोर आले, ज्यावरून तिने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय अंजूने तिचा धर्मही बदलला आहे. पण आता अंजूने ती खूप दुःखी असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसी पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, अंजू म्हणाली, "पाकिस्तानात सर्व काही सकारात्मक आहे. काही वेगळेच नियोजन करून मी येथे आले. पण मी जो काही विचार केला त्याऐवजी भलतंच घडलं. माझ्याकडून काहीना काही चूक झाली आहे. इथे जे काही घडले त्यामुळे माझ्या कुटुंबाचा भारतात अपमान झाला आहे. हे सर्व माझ्यामुळे घडलं आहे, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. दुसरं म्हणजे मुलांच्या मनात माझ्याबद्दल आता नेमकी काय इमेज तयार झाली असेल."

"मला भारतात जायचं आहे"

अंजू पुढे म्हणाली, "मला कोणत्याही मार्गाने भारतात जायचे आहे आणि मी तिथे जाऊ शकते. मला प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा आहे. मला तिथल्या मीडियालाही उत्तर द्यायचं आहे. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, हे मी त्यांना सांगेन. माझी खूप चांगली काळजी घेतली गेली. हा माझा स्वतःचा निर्णय होता. मीडियाच्या दबावामुळे मी लवकर परत जाऊ शकले नाही. मला एकदा जाऊन मुलांना भेटायचं आहे. कारण मी त्यांना दिवसरात्र मिस करत आहे."

पाकिस्तानने अंजूचा व्हिसा वाढवला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण अंजूचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह याने सत्य सांगितलं आहे. वृत्तानुसार, नसरुल्लाहने सांगितलं की, त्यांनी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे. मात्र व्हिसाची मुदत वाढलेली नाही. याशिवाय पोलिसांनी असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे अद्याप असे कोणतेही कागदपत्र नाही, ज्यामुळे अंजूचा व्हिसाची मुदत वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान