शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

"मी देशद्रोही नाहीये, मी नसरूल्लासोबत भारतात येईन, पण पाकिस्तान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:40 IST

पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा भारतीयांना संदेश

Anju in Pakistan: भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूने तिथून भारताला व भारतीयांना संदेश दिला आहे. समोर आलेल्या अंजूच्या व्हिडिओमध्ये तिने भारतात येण्याबाबत सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये अंजूसोबत नसरुल्लाही (Nasarullah) दिसत आहे. अंजू तिच्या पाकिस्तानी फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी जुलैमध्ये खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. अंजूचा व्हिसा जो २० ऑगस्टला संपणार होता, तो आता एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. अंजूच्या मते, भारत आणि पाकिस्तान दोन्ही सुंदर देश आहेत. तसेच, ती पाकिस्तानाच गेली असली तरी ती स्वत: देशद्रोही नाही. अंजूचा व्हिडिओ पाहून ती मीडियाशी बोलत असल्याचे दिसते.

भारत पाकिस्तान त्याच भूमीत

नसरुल्लासोबत दिसत असलेली अंजू म्हणाली, 'प्रत्येकाला वाटत आहे की मी पाकिस्तानात आले म्हणून या जागेचे कौतुक करत आहे. पण तसं नाही, इथे जे आहे ते मी सांगत आहे. भारत देखील सुंदर आहे आणि दोन्ही देश म्हणजे एकच भूमी आहे. माणसांनी नंतर त्याची आखली. माझे भारतावर प्रेम नाही असे नाही. मी देशद्रोही नाहीये, पण पाकिस्तान सुंदर देश आहे. असे असले तरी मी भारतात परत जाणार आहे. एकटीही जाणार आहे आणि नसरूल्लाहच्या सोबतही जाणार आहे."

अंजू म्हणते की तिच्याबद्दल मीडियामध्ये खूप अफवा आहेत. नसरूल्लाहसोबतचा फोटो दाखवून तिने आपल्या देशाशी गद्दारी केली, मुलांवर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. पण तसं अजिबात नाही असं तिचं म्हणणं आहे. 'मीसुद्धा माणूस आहे. माझ्या बाजूनेही थोडा सकारात्मक विचार करा. मी कोणाचीही शत्रू नाही', असे अंजूने म्हटले आहे.

अंजूने अद्याप नसरूल्लाहला पती म्हटलेले नाही... 

अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि नसरुल्लाहशी लग्न केल्याचे वृत्त आहे. तिचे इस्लामिक नाव फातिमा असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नसरुल्लाह अंजूला त्याची पत्नी म्हणत असताना अंजूने त्याला सार्वजनिकरित्या पती म्हणून संबोधलेले नाही. अलीकडेच नसरुल्लाहने अंजूच्या व्हिसाची मुदत वाढवल्याची माहिती दिली होती. त्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने तिच्या व्हिसाची मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे.नसरुल्लाहचे आवाहन

अंजूच्या मुलांना पाकिस्तानात पाठवण्याची विनंती भारत सरकारला करणार असल्याचं नसरुल्लाह यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. दुसरीकडे अंजूचा भारतीय पती अरविंद याने मुलं भारतातच राहतील असं स्पष्ट केलं आहे. अरविंदने अंजूविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. या एफआयआरमुळे नसरुल्ला प्रचंड संतापला आहे. भारतीय माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आपण कोणाला घाबरत नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचवेळी सुरक्षा पुरवण्याच्या अटीवर अंजूला भारतात पाठवण्याबाबत त्याने भाष्य केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानpassportपासपोर्टIndiaभारत