शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

भारताच्या एका अ‍ॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:13 IST

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे.

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली असून, भारताला हा महत्त्वाचा जल करार त्वरित पूर्ववत करण्याची गयावया केली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक बिनबुडाचे आरोप करत स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. भारताने एकतर्फी कारवाई करत हा करार निलंबित केला आहे आणि भारत जाणूनबुजून पाण्याचा वापर शस्त्रासारखा करत असल्याचा खोटा दावा त्यांनी केला.

लाखों लोकांचे जीवन धोक्यात

पाकिस्तानी राजदूत इफ्तिखार अहमद यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले की, "भारताचा हा एकतर्फी निर्णय सिंधू जल कराराच्या मूळ भावनेला धक्का पोहोचवतो. अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो पाकिस्तानी लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले आहे."

ते म्हणाले की, या कृतीमुळे केवळ एका देशाचे नुकसान होत नाहीये, तर आंतरराष्ट्रीय जल कायद्याचेही उल्लंघन केले जात आहे.

६० वर्षांचा करार 

इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराने सहा दशकांहून अधिक काळ दोन्ही देशांतील पाण्याचे समान वाटप नियंत्रित केले आहे. या करारानुसार सिंधू  नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी वाटले गेले आहे. यातील पश्चिम नद्यांवर पाकिस्तानचा तर पूर्व नद्यांवर भारताचा नियंत्रण आहे.

'पहलगाम हल्ल्या'नंतर भारताने घेतले होते मोठे पाऊल

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल कराराला निलंबित करण्यासह अनेक कठोर पाऊले उचलली होती. या कठोर भूमिकेमुळे आपला मोठा तोटा होणार असल्याची जाणीव आता पाकिस्तानला झाली आहे. म्हणूनच तो वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून हा करार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे. पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, "करारातील कोणताही नियम एकतर्फी निलंबन किंवा सुधारणेची परवानगी देत नाही, त्यामुळे आम्हाला कराराचा आदर आणि सामान्य कामकाज लवकर पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : India's action on Indus Water Treaty rattles Pakistan, pleads to UN.

Web Summary : India's firm stance on the Indus Water Treaty has shaken Pakistan, prompting them to appeal to the UN for its resumption. Pakistan accuses India of using water as a weapon and unilaterally suspending the treaty, endangering millions who depend on the water for food and energy security. They want the original agreement restored.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ