शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या एका अ‍ॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:13 IST

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे.

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली असून, भारताला हा महत्त्वाचा जल करार त्वरित पूर्ववत करण्याची गयावया केली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक बिनबुडाचे आरोप करत स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. भारताने एकतर्फी कारवाई करत हा करार निलंबित केला आहे आणि भारत जाणूनबुजून पाण्याचा वापर शस्त्रासारखा करत असल्याचा खोटा दावा त्यांनी केला.

लाखों लोकांचे जीवन धोक्यात

पाकिस्तानी राजदूत इफ्तिखार अहमद यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले की, "भारताचा हा एकतर्फी निर्णय सिंधू जल कराराच्या मूळ भावनेला धक्का पोहोचवतो. अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो पाकिस्तानी लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले आहे."

ते म्हणाले की, या कृतीमुळे केवळ एका देशाचे नुकसान होत नाहीये, तर आंतरराष्ट्रीय जल कायद्याचेही उल्लंघन केले जात आहे.

६० वर्षांचा करार 

इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराने सहा दशकांहून अधिक काळ दोन्ही देशांतील पाण्याचे समान वाटप नियंत्रित केले आहे. या करारानुसार सिंधू  नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी वाटले गेले आहे. यातील पश्चिम नद्यांवर पाकिस्तानचा तर पूर्व नद्यांवर भारताचा नियंत्रण आहे.

'पहलगाम हल्ल्या'नंतर भारताने घेतले होते मोठे पाऊल

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल कराराला निलंबित करण्यासह अनेक कठोर पाऊले उचलली होती. या कठोर भूमिकेमुळे आपला मोठा तोटा होणार असल्याची जाणीव आता पाकिस्तानला झाली आहे. म्हणूनच तो वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून हा करार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे. पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, "करारातील कोणताही नियम एकतर्फी निलंबन किंवा सुधारणेची परवानगी देत नाही, त्यामुळे आम्हाला कराराचा आदर आणि सामान्य कामकाज लवकर पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : India's action on Indus Water Treaty rattles Pakistan, pleads to UN.

Web Summary : India's firm stance on the Indus Water Treaty has shaken Pakistan, prompting them to appeal to the UN for its resumption. Pakistan accuses India of using water as a weapon and unilaterally suspending the treaty, endangering millions who depend on the water for food and energy security. They want the original agreement restored.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ