शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या एका अ‍ॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:13 IST

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे.

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली असून, भारताला हा महत्त्वाचा जल करार त्वरित पूर्ववत करण्याची गयावया केली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक बिनबुडाचे आरोप करत स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. भारताने एकतर्फी कारवाई करत हा करार निलंबित केला आहे आणि भारत जाणूनबुजून पाण्याचा वापर शस्त्रासारखा करत असल्याचा खोटा दावा त्यांनी केला.

लाखों लोकांचे जीवन धोक्यात

पाकिस्तानी राजदूत इफ्तिखार अहमद यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले की, "भारताचा हा एकतर्फी निर्णय सिंधू जल कराराच्या मूळ भावनेला धक्का पोहोचवतो. अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो पाकिस्तानी लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले आहे."

ते म्हणाले की, या कृतीमुळे केवळ एका देशाचे नुकसान होत नाहीये, तर आंतरराष्ट्रीय जल कायद्याचेही उल्लंघन केले जात आहे.

६० वर्षांचा करार 

इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराने सहा दशकांहून अधिक काळ दोन्ही देशांतील पाण्याचे समान वाटप नियंत्रित केले आहे. या करारानुसार सिंधू  नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी वाटले गेले आहे. यातील पश्चिम नद्यांवर पाकिस्तानचा तर पूर्व नद्यांवर भारताचा नियंत्रण आहे.

'पहलगाम हल्ल्या'नंतर भारताने घेतले होते मोठे पाऊल

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल कराराला निलंबित करण्यासह अनेक कठोर पाऊले उचलली होती. या कठोर भूमिकेमुळे आपला मोठा तोटा होणार असल्याची जाणीव आता पाकिस्तानला झाली आहे. म्हणूनच तो वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून हा करार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे. पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, "करारातील कोणताही नियम एकतर्फी निलंबन किंवा सुधारणेची परवानगी देत नाही, त्यामुळे आम्हाला कराराचा आदर आणि सामान्य कामकाज लवकर पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : India's action on Indus Water Treaty rattles Pakistan, pleads to UN.

Web Summary : India's firm stance on the Indus Water Treaty has shaken Pakistan, prompting them to appeal to the UN for its resumption. Pakistan accuses India of using water as a weapon and unilaterally suspending the treaty, endangering millions who depend on the water for food and energy security. They want the original agreement restored.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ