शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

अरुंद गल्लीने केला घात; हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरीतील १५१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 07:00 IST

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील चेंगराचेंगरीत अनेकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील हॅलोविन उत्सवादरम्यानच्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या वाढून १५१ झाली आहे. मृतांत बहुतांशकरून किशोरवयीन तरुण-तरुणींचा समावेश आहे. सेऊलमधील इटावॉन भागातील एका अरुंद गल्लीत शनिवारी रात्री प्रचंड गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. गर्दीत दबल्याने अनेकांना हृदयविकाराचा झटका आला.

‘जे घडले त्यावर माझा विश्वास बसत नाही. ते नरकासारखे होते,’ असे इटावॉनमधील पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे किम मी सुंग म्हणाले. उपचार घेत असलेल्या १०४ जखमींपैकी २४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असे सेऊल शहराच्या आपत्ती मुख्यालयाने सांगितले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील चेंगराचेंगरीत अनेकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा

द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी एक राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत कार्यालयांवरील झेंडे अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले. यून म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी मदत करणे आणि जखमींवर उपचार करणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाDeathमृत्यू