शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:29 IST

How many people died in operation sindoor: भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री दरम्यान केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच दोन वेळा कॉल होता. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. ६ आणि ७ मे रोजीच्या रात्री केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पुढे लष्करी संघर्ष वाढला. दोन-तीन दिवस दोन्ही देशात तणाव प्रचंड वाढला होता. पण, नंतर अचानक शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया टुडे विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल करण्यात आला होता. 

शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानचे ७ मे रोजीच दोन कॉल

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर ७ मे रोजी सांयकाळीच पाकिस्तानकडून भारताला दोन वेळा कॉल करण्यात आला. हा कॉल शस्त्रसंधी करण्यासंदर्भात होता. 

वाचा >>नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना

पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ यांच्याकडून औपचारिकपणे भारताशी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर १० मे रोजी दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली होती. 

याच चर्चेत दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यास सहमती दिली. ही शस्त्रसंधी तणाव कमी करण्यासाठी करण्यात आली. 

ऑपरेशन सिंदूरमध्ये किती लोकांचा मृत्यू?

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याचा आकडा आता समोर आला असून, १६० जणांचा मृत्यू झाला आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात २० पेक्षा जास्त मारले गेले. हा जैश ए मोहम्मदचा अड्डा होता. 

त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो लष्करी संघर्ष झाला. त्यात पाकिस्तानच्या ४० सैनिकांचा मृत्यू झाला. पण, पाकिस्तानने ११ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी