शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 23:46 IST

Operation Sindoor: भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे.

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामावरून काँग्रेस केंद्र सरकारला प्रश्न विचारत असतानाच, दुसरीकडे मात्र भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे. जगभरातील अनेक देश भारताच्या या कारवाईचे कौतुक करत असून, दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानकडे बोट दाखवत आहे. पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटमधीलच्या मायकल रुबिन यांनी भारत राजनैतिक आणि लष्करी या दोन्ही पातळ्यांवर जिंकला असल्याचे म्हटले आहे. 

मायकल रुबिन म्हणतात की, लष्करी आणि राजनैतिक या दोन्ही आघाड्यांवर भारताचा हा मोठा विजय आहे. भारत राजनैतिकदृष्ट्या जिंकण्याचे कारण म्हणजे आता सर्व जगाचे लक्ष पाकिस्तान प्रायोजक दहशतवादावर आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात लष्करी गणवेशातील पाकिस्तानी अधिकारी उपस्थित होते. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी आणि आयएसआय किंवा पाकिस्तानी सशस्त्र दलाचा सदस्य यांच्यात कोणताही फरक नाही. आता जगभरातून पाकिस्तानला त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी जोर धरू लागेल. भारताने राजनैतिकदृष्ट्या संवादाचा सूर बदलला आहे. लष्करीदृष्ट्या सांगायचे झाल्यास हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. भारताविरोधात प्रत्येक युद्ध पाकिस्तानने सुरू केले आणि तो कसा जिंकला, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ४ दिवसांचे युद्ध कसे जिंकले, हे स्वतःला पटवून देणे पाकिस्तानचा चांगलेच कठीण जाणार आहे, असे रुबिन यांनी म्हटले आहे. 

प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.

रुबिन यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारताला हा संघर्ष कधीच अपेक्षित नव्हता. हा संघर्ष भारतावर लादण्यात आला आहे. प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. पण भारताची जबाबदारी आहे की त्यांनी ठामपणे सांगितले की, नाही. आम्ही आमच्या सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले कधीही सहन करणार नाही. म्हणूनच भारताने जे केले, ते अत्यंत आवश्यक होते, असे रुबिन यांनी नमूद केले.

दरम्यान, पाकिस्तान एखाद्या श्वानाप्रमाणे दोन पायांत शेपूट घालून युद्धविराम करण्यासाठी पळत सुटला. पाकिस्तानी सैन्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे केले. पाकिस्तानी लष्कर केवळ हरलेच नाही तर ते खूप वाईट रीतीने हरले, या वस्तुस्थितीपासून पळ काढता येणार नाही. पाकिस्तानी लष्करात खूप समस्या आहेत आणि ते दुबळे आहे, हे स्पष्ट आहे. असीम मुनीर आता पदावर कायम राहतील का, असा प्रश्न उपस्थित करताना रुबिन म्हणाले की, मूळात पाकिस्तानला स्वतःचे घर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि असे करण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत का, हा खरा आणि खुला प्रश्न आहे, असे रुबिन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAmericaअमेरिकाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला